पीटीआय, सहारणपूर

सत्ताधारी भाजपची उक्ती आणि कृती यामध्ये फरक असल्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा सत्तेत येणे सोपे असणार नाही, असा दावा बसपप्रमुख मायावती यांनी रविवारी केला. मायावती या सात वर्षांनंतर प्रचारमोहिमेत सक्रिय झाल्या आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथून त्यांनी आपल्या प्रचारमोहिमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजपवर जनतेशी खोटे बोलल्याचा आणि सामथ्र्यवान लोकांच्या हितासाठी काम केल्याचा आरोप केला.

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

आपला पक्ष कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवत आहे आणि तिकीट वाटपात समाजाच्या सर्व स्तरांना योग्य वाटा दिला आहे, असे मायावती यांनी भाषण करताना सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. भाजपवर टीका करताना मायावती म्हणाल्या की, ‘‘गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष केंद्रात आणि बहुसंख्य राज्यांमध्ये सत्तेवर आहेत. त्यांच्या जातीयवादी, भांडवलवादी, संकुचित व सूडाची धोरणे आणि काम करण्याची शैली आणि त्यांच्या उक्ती व कृतीमधील लक्षणीय फरक यामुळे आता असे दिसते की, निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात झाल्या तर त्यांना पुन्हा सत्ता मिळणे सोपे असणार नाही’.