केंद्र सरकारने अनुकंपावर आधारित नोकरी देण्याच्या नियमात मोठा बदल केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे अकाली निधन झाले किंवा वैद्यकीय कारणामुळे ५५ पेक्षा कमी वय असताना निवृत्त झाल्यास अशावेळी त्यांच्या जागेवर घरातील एकाला नोकरी देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत केवळ पत्नी किंवा अविवाहित मुलगा-मुलगी यांनाच नोकरी मिळत. परंतु नव्या बदलानुसार आता विवाहित मुलालाही नोकरी मिळू शकते. कार्मिक मंत्रालयाने मंगळवारी यासंबंधी आदेश जारी केला आहे. अनुकंपाबाबतचे पूर्वीचे नियम जैसे थे असतील, असेही त्यात म्हटले आहे.
मंत्रालयाच्या आदेशानुसार ज्यांना २०१३ ते २०१५ च्या दरम्यान अर्ज केलेल्यांना जुन्या नियमामुळे अनुकंपावर नोकरी मिळत नव्हती. त्यांच्या अर्जावर आता पुन्हा विचार केला जाऊ शकतो. जानेवारी २०१३ मध्ये सरकारी अनुकंपावर आधारित नोकरीच्या कायद्यात बदल करण्यात आले होते. यात विवाहित मुलीलाच नोकरी मिळण्याची संधी होती. परंतु या नव्या बदलामुळे विवाहित मुलालाही नोकरीची संधी मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government changed law now married sons of deceased government servants can have job
First published on: 07-09-2016 at 13:12 IST