दहशतवादविरोधी राष्ट्रीय केंद्रे स्थापन करण्यास विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्य सरकारे विरोध करीत असल्याचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप भाजपने फेटाळला असून दहशतवादासारख्या गंभीर मुद्दय़ावर केंद्र सरकारने राजकारण करू नये, असे बजावले आहे.
हैदराबाद स्फोटांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे या प्रश्नावर सरकारने राजकारण करणे टाळून योग्य पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात अधिक समन्वयाची गरज आहे, असे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
एकमेकांना दूषणे देण्याऐवजी सरकारने गुप्तचर यंत्रणा सक्षम करावी आणि केंद्र आणि राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण करावी, अशी मागणीही प्रसाद यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘केंद्राने राजकारण करू नये’
दहशतवादविरोधी राष्ट्रीय केंद्रे स्थापन करण्यास विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्य सरकारे विरोध करीत असल्याचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप भाजपने फेटाळला असून दहशतवादासारख्या गंभीर मुद्दय़ावर केंद्र सरकारने राजकारण करू नये, असे बजावले आहे.
First published on: 24-02-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government shoud not play politics