Congress leader Jairam Ramesh slam BJP : काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश हे गेल्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन सिंदूर आणि परदेशात पाठवण्यात आलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळांबद्दल सरकारला सातत्याने प्रश्न विचारत आहेत. दरम्यान रमेश यांनी गुरूवारी केलेल्या एका विधानामुळे वेगळाच वाद सुरू झाला आहे. पहलगाम येथे हल्ला करणारे दहशतवादी जसे खुलेपणाने फिरत आहेत तसेच आपले नेतेही फिरत असल्याचे विधान रमेश यांनी केले आहे. यानंतर त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, जे साथ शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहेत त्यामध्ये अनेक काँग्रेसच्या नेत्यांचा देखील समावेश आहे. ज्यापैकी एका टीमचे नेतृत्वा काँग्रेसचे खासदार शशी थरूर करत आहेत.

जयराम रमेश नेमकं काय म्हणाले?

एएनआयशी बोलताना, राज्यसभेचे खासदार रमेश यांनी गुरुवारी म्हणाले की, भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांना पाकिस्तानशी काही देणं-घेणं नाही. एक महिना झालं, २२ एप्रिल रोजी पहलगामचा हल्ला झाला होता. आजही ते दहशतवादी इकडे-तिकडे फिरत आहेत. डिसेंबर २०२३ रोजी पुंछमधील दहशतवादी हल्ल्यात त्यांची भूमिका होती, ऑक्टोबर २०२४ मध्ये गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये त्यांची भूमिका होती, त्याच महिन्यात गुलमर्ग येथे एक दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामध्येही त्यांची भूमिका होती. म्हणजेच १८ महिन्यांत पहलगाम येथील दहशतवाद्यांनी चार दहशतवादी हल्ले केले आहेत. आज ते (दहशतवादी) इकडे-तिकडे फिरत आहेत. आमचे खासदारही इकडे-तिकडे फिरत आहेत आणि दहशतवादीही इकडे-तिकडे फिरत आहेत. गंभीरतेने आम्ही हे प्रश्न विचार आहोत, याची उत्तरं दिली जात नाहीत. भाजपा फक्त काँग्रेस पक्षाला लक्ष्य करते.”

भाजपाची टीका

दरम्यान भाजपाकडून रमेश यांच्या विधानावर टीका करण्यात आली आहे. आपल्या खासदारांची तुलना दहशतवाद्यांशी करणारे त्यांचे विधान हे सर्वात क्रूर आहे असे भाजपाने म्हटले आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “राहुल गांधी यांचा उजवा हात असलेले जयराम रमेश खासदारांची तुलना दहशतवाद्याशी करतात.”

शशी थरूर यांनी मोदी सराकरच्या कार्यकाळात केलेल्या सर्जीकल स्ट्राईक या पहिल्यांदाच करण्यात आल्याच्या संदर्भातील विधानानंतर काँग्रेसने त्यांना जाहीरपणे फटकारले होते. थरूर यांन पनामा येथे एका बैठकीत बोलताना हे विधान केले होते. दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते उदीत राज यांनी यूपीए सरकारच्या काळात देखील अशा स्ट्राईक करण्यात आल्या होत्या मात्र त्यांचे अशा प्रकारे राजकीय भांडवल करण्यात आले नव्हते असे म्हटले आहे.

विशेष अधिवेशन न बोलवण्यावरून टीका

दरम्यान एएनआयशी बोलताना जयराम रमेश यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन न बोलावल्याबद्दल भाजपा सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षांकडून विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे अशी मागणी केली जात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रमेश म्हणाले की, आता ऐकायला मिळत आहे की आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त २५ आणि २६ जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. एक व्यक्ती ११ वर्षांपासून अघोषित आणीबाणी चालवत आहे, जी २६ मे २०१४ पासून लागू आहे ते एक विशेष अधिवेशन बोलवू इच्छित आहेत. ५० वर्षांपूर्वी काय झालं? आजचे मुद्द्यांपासून लक्ष्य विचलित करण्यासाठी ५० व्या वर्धापन दिनाबद्दल बोलत आहेत.”