वायनाड : निवडणूक रोखे म्हणजे उद्योजकांना धमकावून खंडणी घेण्याचा प्रकार आहे असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. प्रत्येक छोटया शहरात असे खंडणीखोर असतात. मात्र निवडणूक रोखे हे त्याचेच स्वरूप असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर ते मोदी करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा >>> घडयाळाचे काटे उलटे फिरवू नका! मतपेटीद्वारे गुप्त मतदानाच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

case registered against 22 including sharad pawar group mla jitendra awad at mumbra police station
आमदार जितेंद्र आव्हाडांसह २२ जणांवर गुन्हे दाखल; खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा तक्रारदारीत आरोप
Akola, Harish Pimple, BJP MLA, Arjun Lotane, social media, Prime Minister Modi, verbal spat, threats, police complaint, Murtijapur, controversy, corruption, akola news, latest news, loksatta news,
मोदींवर टीका करताच भाजप आमदार भडकले….वारकऱ्याला थेट मारण्याची धमकी दिल्याचा…
akola, uddhav thackeray
अकोला: महिला सरपंचाला शिवीगाळ, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्राॅसिटी; राजकीय दबावातून गुन्हा दाखल केल्याचा…
Petition, Rahul Gandhi,
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राऊत यांच्या विरोधात याचिका; मतदान यंत्राबाबत खोट्या, दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा दावा
Deepali Chavan suicide case, forest officer Deepali Chavan, lady singham forest officer Deepali Chavan, investigation of forest officer Deepali Chavan suicide case, investigation of Deepali Chavan suicide case stalled, vishleshan article, loksatta explain
‘लेडी सिंघम’ वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास का रखडला? प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न?
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Rahul Gandhi debut as Leader of the Opposition first speech aggression
राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?
Controversy, Shukre commission,
शुक्रे आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही यावरून वाद, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतच मतभेद

वायनाड मतदारसंघातील प्रचारात राहुल यांनी केंद्र सरकार उद्योजकांना धमकावण्यासाठी भाजप सरकारची हे डावपेच असल्याची टीका केली. देशातील काही मोजक्या उद्योजकांना मोदींनी मदत केल्याचा आरोप राहुल यांनी केला. निवडणूक रोख्याच्या मुद्दयावर मुलाखतीत पंतप्रधानांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपला यातून मोठया प्रमाणात लाभ झाल्याची टीका राहुल यांनी केली. अन्य एका ठिकाणी सभेत राहुल यांनी पंतप्रधानांना देश चालविण्याची समज नसल्याची टीका केली. भाववाढ, बेरोजगारी या मुद्दयावर पंतप्रधानांनी मौन बाळगल्याचा आरोप राहुल यांनी केला. अग्निपथ योजना युवकांना अपमान करणारी असून, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर ती रद्द करेल याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. भाजप तसेच संघ घटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

घटनाबदलाचा प्रयत्न -प्रियंका

तितबोर (आसाम)): काँग्रेस सत्तेत आल्यास आसामच्या चहा मळयातील कामगारांचे वेतन वाढवले जाईल असे आश्वासन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिले. जोरहट जिल्ह्यात गौरव गोगोई यांच्या प्रचारासाठी प्रियंका यांचा रोड शो झाला. या वेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. विरोधकांना घटना बदलायची आहे असा दावा त्यांनी या वेळी केला.