मणिपूरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कारतील कर्नल, त्यांची पत्नी व मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जवान देखील शहीद झाले आहेत. मागील अनेक वर्षांमधील या क्षेत्रात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना शनिवार सकाळी जवळपास १० वाजता मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळ घडली. आसाम रायफल्सच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.