भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेच्या संशयित सदस्यांनी गुरुवारी मध्यरात्री झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात घडवून आणलेल्या स्फोटात रेल्वे रुळांच्या काही भागाचे नुकसान झाले.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

 या स्फोटामुळे हावडा- नवी दिल्ली मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे सहा तास विस्कळीत झाल्या. संशयित माओवाद्यांनी केलेल्या या स्फोटामुळे रेल्वे रुळांच्या फिशप्लेट्सचे नुकसान झाले. या स्फोटामागे असलेल्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमित रेणु यांनी सांगितले.

 ही घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिचाकी व कर्माबाद रेल्वे स्थानकांदरम्यान घडल्याची माहिती धनबाद येथील रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ कमांडर हेमंत कुमार यांनी दिली. स्फोटात पॅनेल क्लिपचेही नुकसान झाले.

 या घटनेमुळे पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागातील गोमोह- गया सेक्शनमधून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या, किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. सकाळी साडेसहा वाजेनंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली, असेही कुमार यांनी सांगितले. ज्या गाडय़ांचे मार्ग बदलावे लागले, त्यात नवी दिल्ली- भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस आणि नवी दिल्ली- सियालदा राजधानी एक्सप्रेस यांचा समावेश होता. धनबाद- डेहरी-ऑन-सोन एक्सप्रेस रद्द करावी लागली. तीन दिवसांपूर्वी माओवाद्यांनी गिरिडीह जिल्ह्यातील सरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मोबाईल टॉवर आणि पाण्याची टाकी स्फोटाने उडवून दिली होती. शिरावर १ कोटी रुपयांचे इनाम असणारा आपला उच्चपदस्थ नेता प्रशांत बोस ऊर्फ किशन दा याच्या अटकेच्या विरोधात या प्रतिबंधित संघटनेने झारखंड व बिहारमध्ये २४ तासांच्या बंदचे आवाहन केले आहे. झारखंड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांतील जाळपोळीच्या शंभरहून अधिक घटनांचा बोस हा सूत्रधार होता.