इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शाह यांच्यापेक्षा हुशार राजकारणी असल्याचे म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात प्रश्नांना उत्तर देताना, अमित शाह हे षड्यंत्र करु शकतात, ते गोष्टी हाताळण्यात हुशार आहेत, पण मोदींची बुद्धिमत्ता त्यांच्यापेक्षा जास्त आहे, असे रामचंद्र गुहा यांनी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षात मोदींच्या डोळ्यांसमोर घडलेल्या सर्व गोष्टींची चिंता करायला हवी. विशेषत: २०१९ नंतर अमित शाहांच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यापासून काय झाले याबाबत विचार करायला हवा, असेही गुहा म्हणाले.

 “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कुशाग्रतेवर शंका घेऊ नये. मला विश्वास आहे की अमित शाह यांना राजकीय समज जास्त आहे, ते गोष्टी हाताळण्यात पटाईत आहेत आणि त्यात ते फूट पाडणारेही आहेत. पण मोदींना गोष्टी कळतात. गोष्टी कशा बदलायच्या हे मोदींना माहीत आहे. भाजपाने पटेल आणि बोस यांना आपले आयकॉन म्हणून सादर केले आहे, जे दोघेही आयुष्यभर काँग्रेसचे समर्थक होते. यावरून मोदी किती हुशार आहेत हे समजू शकते. मोदींनी कमी लेखू नये. त्यांच्यात कल्पना आणि इतिहास त्यांच्या पद्धतीने रचण्याची क्षमता आहे. भविष्य कसे असावे याची स्वप्ने पाहण्यातही त्यांचा काही मेळ नाही. मोदींचे विरोधक म्हणून राहुल गांधी हे केवळ राजकीयच नव्हे, तर वैचारिक पातळीवरही अक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे स्पष्टपणे म्हणता येईल,” असे रामचंद्र गुहा यांनी म्हटले आहे.

narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
Akhilesh Yadav
रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

 “गांधी कुटुंब अनेक प्रकारे मोदी आणि भाजपचे चांगले मित्र असल्याचे सिद्ध झाले आहे. आज जे घडत आहे त्यावर इतिहास स्वतः निर्णय घेईल, पण मी हे कल्पनांपेक्षा वेगळ्या नजरेने बघतोय. भारतीय लोकशाहीचा दर्जा खालावणाऱ्या घटना मी खोलवर पाहत आहे. या सर्व गोष्टींची काळजी करायला हवी. गेल्या आठ वर्षात मोदींच्या डोळ्यांसमोर घडलेल्या सर्व गोष्टींची चिंता करायला हवी. विशेषत: २०१९ नंतर अमित शाहांच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यापासून काय झाले याबाबत विचार करायला हवा, असेही गुहा म्हणाले.

“सोनिया गांधी आणि राहुल गांधी काँग्रेसचे प्रभारी आहेत, ते यापुढेही चालणार आहे. कारण सोनिया गांधींच्या इतिहासात गांधी घराणेच काँग्रेस आहे. यात महात्मा गांधींचा नक्कीच सहभाग आहे, पण त्यात प्रामुख्याने नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधी दिसतात. काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष आणि परिवारवाद यामुळे भाजपाला एवढी ताकद मिळाली आहे की, ते सरदार पटेलांवर आपला दावा सांगत आहेत. पटेलच नाही तर सुभाषचंद्र बोस आणि इतर अनेक मोठे लोक काँग्रेस नेते आहेत. मोदी आणि शाह यांना काँग्रेसचे नेतृत्व नेहमीच सोनिया-राहुल यांच्या नेतृत्वाखाली हवे आहे कारण त्यांचे राजकीय, वैचारिक आणि ऐतिहासिक हेतू पूर्ण होत आहेत, असेही गुहा यांनी म्हटले.