पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या २०१४ -१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात ९६३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर ४१३ जवान शहीद झाले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरंक्षण मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की , २०१४ मध्ये १०४,  २०१५ – ९७,  २०१६ – १४०, २०१७ – २१० तर २०१८ मध्ये २४९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. जम्मू – काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या पथकावर हल्ल्यानंतर लष्कराकडून दहशतवादविरोधी कारवाई अधिक जलद व कठोर करण्यात आली आहे. काश्मीर घाटीला दहशतवाद मुक्त करण्यासाठी सतत करावायाकरून दहशतावाद्यांचा खात्मा केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: End of 963 terrorists during the first tenure of modi government msr
First published on: 17-07-2019 at 13:57 IST