राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही राज्ये हातातून गेल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. पण, ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी बैठकीला येण्याचं टाळलं होतं. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता, १९ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेशाच्या मतमोजणीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली होती. पण, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नियोजित कार्यक्रमामुळे तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी मिचाँक चक्रीवादळामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला येणं टाळलं होतं. यामुळे बैठक पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Rahul Gandhi and Sharad Pawar Maharashtra Election Politics
राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The leaders of the constituent parties expressed their sentiments in the condolence meeting that the India Maha Aghadi was united because of Yechury
येचुरींमुळे ‘इंडिया’ महाआघाडी एकत्र! शोकसभेत घटक पक्षांच्या नेत्यांकडून भावना व्यक्त
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
jayant patil latest news
कार्यकर्त्यांनी घोषणा देताच संतापले जयंत पाटील; म्हणाले, “असा पोरकटपणा करणार असाल तर…”
Sulabha Khodke, NCP, Ajit pawar group,
काँग्रेस आमदार सुलभा खोडके घड्याळ बांधण्याच्या तयारीत?
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध
Congress complains to Governor about law and order neglecting farmers print politics news
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कायदासुव्यवस्था ढासळली; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार

आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. ‘एक्स’वर जयराम रमेश म्हणाले, “इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी १९ डिसेंबर २०२३ ला दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. जुडेगा भारत, जितेंगा इंडिया!”

दरम्यान, काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे या बैठकीत समान किमान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.