एका अहवालानुसार, ११३ देशांच्या ग्लोबल फूड सिक्युरिटी (जीएफएस) निर्देशांक २०२१ मध्ये भारत ७१ व्या क्रमांकावर आहे. एकूण गुणांच्या बाबतीत भारताने दक्षिण आशियात सर्वोत्तम स्थान मिळवले आहे पण अन्न सुरक्षेच्या बाबतीत बाबतीत शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यापेक्षा मागे आहे. अन्न सुरक्षेच्या श्रेणीमध्ये पाकिस्तानने (५२.६ गुणांसह) भारतापेक्षा (५०.२ गुण) चांगले गुण मिळवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 इकॉनॉमिस्ट इम्पॅक्ट आणि कॉर्टेवा अ‍ॅग्रीसायन्सने मंगळवारी जारी केलेल्या जागतिक अहवालात म्हटले आहे की, जीएफएस इंडेक्स -२०२१ च्या या श्रेणीमध्ये ६२.९ गुणांसह श्रीलंकेने आणखी चांगली कामगिरी केली आहे. आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फिनलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि अमेरिका यांनी ७७.८ ते ८० गुणांच्या एकूण जीएफएस निर्देशांकात अव्वल स्थान सामायिक मिळवले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India ranks 71st global food security index 2021 behind pakistan sri lanka abn
First published on: 20-10-2021 at 11:42 IST