टूर ऑफ ड्यूटी अग्निपथ योजनेअंतर्गत, लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन सेवांमध्ये भरतीच्या नवीन प्रणालीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत भरती झालेल्या १०० टक्के सैनिकांना चार वर्षांनी सेवेतून मुक्त केले जाईल आणि त्यानंतर २५ टक्के सैनिकांना पूर्ण सेवेसाठी पुन्हा भरती केले जाईल. टूर ऑफ ड्यूटीच्या अंतिम स्वरूपावर बरीच चर्चा झाली असून काही नवीन सूचना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशिक्षणासह तीन वर्षांच्या सेवेनंतर काही टक्के सैनिक निवृत्त केले जातील. काहींना पाच वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर काढून टाकले जाईल. पूर्ण मुदतीसाठी केवळ २५ टक्के सैनिकांना ठेवले जाईल, असा सुरुवातीला प्रस्ताव होता. नव्या प्रस्तावात काही बदल करण्यात आले आहेत. चार वर्षांच्या सेवेनंतर सर्वजण निवृत्त होतील. मात्र, २५ टक्के सैनिकांना निवृत्तीनंतर ३० दिवसांच्या आत परत बोलावण्यात येईल. त्यांच्या रुजू होण्यासाठी नवीन तारीख दिली जाईल. वेतन आणि निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी त्यांची मागील चार वर्षांची कंत्राटी सेवा त्यांच्या पूर्ण झालेल्या सेवेमध्ये गणली जाणार नाही. अशा स्थितीत सरकारची मोठी बचत होणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army jobs all soldiers will be retired after 4 years of service only 25 percent will be returned abn
First published on: 28-05-2022 at 13:31 IST