भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सर्जिकल स्ट्राइकमध्ये यशस्वी करणाऱ्या १९ जवानांना २६ जानेवारीला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र यामधील कोणाचीही माहिती देण्यात आली नव्हती. टाईम्स ऑफ इंडियाने सर्जिकल स्ट्राइकबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या पथकामध्ये एक कर्नल, पाच मेजर, दोन कॅप्टन, एक सुभेदार, दोन नायब सुभेदार, तीन हवालदार, एक लान्स नायक आणि चार पॅराट्रॉपर्सचा समावेश होता. हे सर्व जवान पॅरा रेजिमेंटच्या चौथ्या आणि नवव्या बटालियनचे होते. यामधील मेजर रोहित सूरी यांचा किर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यासोबतच सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या कर्नल हरप्रीत संधू यांचा युद्ध सेवा पुरस्कार आणि त्यांच्या पथकाला चार शौर्य पुरस्कारांसह १३ सेवा पदकांनी गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्जिकल स्ट्राइक दरम्यान कर्नल हरप्रीत संधू यांनी दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर दोनवेळा हल्ले केले. शत्रूच्या लॉन्च पॅडचा अचूक वेध घेणाऱ्या हरप्रीत यांचा युद्ध सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे भारतीय सैन्याने उरी हल्ल्यानंतर लगेचच सर्जिकल स्ट्राइकची तयारी केली होती. मात्र सर्जिकल स्ट्राइक करणारे पथक अमावस्येच्या रात्रीची वाट पाहात होते. त्यामुळेच २८-२९ सप्टेंबरच्या रात्री सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian soldiers did surgical strike tells in commendation cards waits for amavasya
First published on: 09-02-2017 at 21:13 IST