पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला चढवला. त्यात दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैनिकांनी जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर भारतानेही पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर शस्त्रसंधी धाब्यावर बसवणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांनी कांगावा केला आहे. भारताने दुःसाहस केले तर सडेतोड उत्तर देण्यात येईल, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तान आणि भारतात तणाव वाढला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या संचालकांमध्ये हॉटलाइनवरून चर्चा झाली. ही चर्चा दर आठवड्याला होते, असे मोघम उत्तर पाकिस्तानी सैन्याने दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचा पाकिस्तानी सैनिकांवर भारताने केलेला आरोप तथ्यहिन असल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानी सैनिकांनी कोणत्याही क्षेत्रात घुसून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नाही. सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी केली नाही, असे पाकिस्तानी लष्कराच्या संचालकांनी (लष्करी कारवाई विभाग) म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यातील सद्यस्थितीवरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचा आरोप करण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटल्याचे पाकच्या डीजीएमओंनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir attack pakistan army dares india reply to any reckless action
First published on: 02-05-2017 at 19:58 IST