मोदीजी कोणत्याही गाडीला चार चाकं असतात आणि ती चाकं ठप्प झाली तर गाडी चालत नाही. सरकारचंही तसंच आहे असं म्हणत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. काय म्हणाले आहेत कपिल सिब्बल? "सरकारची जी व्यवस्था त्याची चार चाकं असतात पहिलं चाक आहे संसद तिथे तुम्ही कधीही उत्तर देत नाही. दुसरं चाक आहे सरकार ते तुम्ही तुमच्या मनमानीने चालवता, तिसरं चाक आहे न्यायव्यवस्था जिथे जाऊन सरकार सांगंत की रस्त्यावर कुणी प्रवासी नाहीत. चौथं चाक आहे निवडणूक आयोग.. तिथे तेच होतं जे तुम्ही सांगता. ही चारही चाकं चालत नाहीत. तुम्ही चालकाच्या भूमिकेत आहात. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सगळ्यांना ठाऊक आहे." असं म्हणत कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले आहेत. मोदी जी गाड़ी के चार पहिये होते है उनके बिना गाड़ी नहीं चलती। एक पहिया है संसद है जहां आप कभी जवाब नहीं देते। दूसरा पहिया है सरकार, वो भी अपनी मनमर्जी करती है। तीसरा पहिया है न्यायपालिका, आपकी सरकार वहां जाकर बयान देती है कि सड़क पर कोई प्रवासी नहीं है: कपिल सिब्बल,कांग्रेस नेता pic.twitter.com/5YW2FVncdg — ANI_HindiNews (@AHindinews) June 13, 2020 चौथा पहिया है चुनाव आयोग, वहां जो आप कहते हैं वो होता है। गाड़ी के चार पहिये चल नहीं रहे तो गाड़ी आगे चलेगी कैसे? ड्राइवर सीट पर आप बैठे हैं। न आपको पूरी तरह से जानकारी है कि हमारे देश की आर्थिक स्थिति किस मोड़ पर है, न आपके वित्त मंत्री को है: कपिल सिब्बल, कांग्रेस नेता — ANI_HindiNews (@AHindinews) June 13, 2020 देशाची आर्थिक अवस्था काय आहे? याची माहिती ना पंतप्रधान मोदींना आहे किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.