मागील काही दिवसांपासून केरळ सरकार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात वाद सुरू आहे. राज्यपाल खान यांच्याविरोधात एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत केलेल्या आंदोलनावरून या वादाला तोंड फुटलं. यावरून खान यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर आरोप केले. हे आंदोलन मुख्यमंत्र्यांनीच घडवून आणलं. आंदोलन करणारे विद्यार्थी हे भाड्याने आणलेले लोक आहेत, असा आरोप राज्यपालांनी केला. तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांना ‘गुन्हेगार’ संबोधलं आहे.

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या एसएफआय सदस्यांच्या गटाला ‘गुन्हेगार’ संबोधल्याबद्दल मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हल्लाबोल केला. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विचलित माणसाला मोकळं सोडलं आहे, अशी टीका विजयन यांनी केली. ते अदूर येथील एका मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल खान यांनी कन्नूर येथे केलेल्या वक्तव्यावरूनही टीका केली.

Political controversy over Prajwal Revanna inquiry
प्रज्वल रेवण्णाच्या चौकशीवरून राजकीय वाद; भाजप सीबीआयसाठी आग्रही तर मुख्यमंत्री ‘एसआयटी’ तपासावर ठाम
Mamata Banerjee demands Governos resignation over forest encroachment issue
राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी; वनयभंगाच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी आक्रमक
uddhav thackeray s had plan to arrest bjp leaders says eknath shinde
भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
Eknath Shinde Sanjay Raut
नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत
Eknath Shinde Raj Thackeray
“माझ्या पक्षाचं चिन्ह न्यायालयातून…”, राज ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; शिवसेनेच्या ऑफरबाबत म्हणाले…
loksatta explained article, Chief Minister, BJP, seat allocation, influence, eknath shinde, mahayuti, lok sabha election 2024
विश्लेषण : जागावाटपात भाजपवर मुख्यमंत्र्यांची सरशी? महायुतीत शिंदेंचा प्रभाव वाढतोय का?
Delhi Police issues notice to Telangana Chief Minister Revanth Reddy for tampering with Home Minister Amit Shah footage
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी पाचारण; गृहमंत्री अमित शहा यांच्या चित्रफितीत फेरफार केल्याचा आरोप
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग

“अशा विचलित माणसाला असं मोकळं सोडणं योग्य नाही. त्यांना अशा स्थितीत सोडणं चांगलं नाही, हे किमान केंद्र सरकारने समजून घेतलं पाहिजे. केंद्र सरकारच्या संगनमताने सर्व काही घडत आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यपाल आरिफ खान हे त्यांच्या विचारसरणीला विरोध करणार्‍यांना ‘बदमाश’ (रास्कल्स) म्हणत आहेत. याआधी त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनाही बदमाश म्हटलं होतं. आता ते आंदोलक विद्यार्थ्यांना ‘बदमाश’ आणि ‘गुन्हेगार’ म्हणत आहेत. आमच्या सरकार विरोधातही अशी निदर्शने केली जात आहेत, परंतु आम्ही आंदोलकांना कधीही “बदमाश किंवा गुन्हेगार” म्हटलं नाही, असं विजयन म्हणाले.