नवी दिल्ली : अदानी समूहापासून म्युच्युअल फंड दूर राहिले, मग, सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची कंपनी, ‘एलआयसी’ने धोकादायक गुंतवणूक का केली, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. ‘हम अदानी के है कौन’ प्रश्नमालिकेत सोमवारी काँग्रेसने केंद्र सरकारला आणखी तीन प्रश्न विचारले.

अदानी समूहामध्ये ‘एलआयसी’ने गुंतवणूक करण्यापूर्वी, खासगी गुंतवणूकदारांनी किती गुंतवणूक केली, त्यांचा या समूहामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भातील दृष्टिकोन काय, याची शहानिशा केंद्र सरकारने का केली नाही? ‘भांडवलदार मित्रां’ना लाभ मिळवून देण्याचा तर हा प्रकार नव्हे, असा प्रश्न उपस्थित करून ‘एलआयसी’च्या ३० कोटी विमाधारकांच्या पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.  

dispute between MP Nilesh Lanke and Guardian Minister Radhakrishna Vikhe increased
विखे विरुद्ध लंके वाद चिघळला
vijay wadettiwar, budget 2024,
अर्थसंकल्पावर वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले, “ही तर काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी”
P chidambaram on budget 2024
Congress On Budget 2024 : निर्मला सीतारमण यांनी चोरल्या राहुल गांधींच्या कल्पना; बजेटवर काँग्रेसची प्रतिक्रिया
thorat
फुटीर आमदारांवर कारवाई; काँग्रेसने नावे जाहीर करण्याचे टाळले
government stance unclear on reservation issue says sharad pawar
आरक्षणाबाबत सरकारची भूमिका अस्पष्ट; सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याबाबत शरद पवार यांचे स्पष्टीकरण
Key takeaways from PM Modi replies in Parliament
हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?
Prime Minister Narendra Modi criticizes Congress as anti Dalit  anti tribal OBC in Rajya Sabha
काँग्रेस दलित, आदिवासी ओबीसीविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभेत टीका, संविधानाला हरताळ फासल्याचा आरोप
What Narendra Modi Said?
लोकसभेत मोदी म्हणाले, “काँग्रेसची ओळख आजपासून परजीवी पक्ष, कारण..”, निकालांचा अर्थही उलगडला

अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांभोवती संशयाचे धुके गडद होत होते. त्याची ‘सेबी’कडून चौकशीही केली गेली होती. अदानी समूहातील संशयास्पद गुंतवणूकदारांसंदर्भात पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय अर्थमंत्रालय वा ‘एलआयसी’कडून एकदा तरी जाहीर शंका व्यक्त केली गेली का? या शंका फेटाळल्या गेल्या का आणि कोणी फेटाळल्या, असाही मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला.

‘नुकसानीची माहिती लोकांना देणार काय?’

अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य घसरले असून ‘एलआयसी’चे किती नुकसान झाले, याची माहिती लोकांना देणार का?  ‘एलआयसी’ने अदानी समूहामध्ये केलेल्या दिशाहिन गुंतवणुकीमुळे समभागधारकांच्या ‘एलआयसी’वरील विश्वासाला धक्का लागण्याची शक्यता असून त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे, असाही प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.