भारताचे ‘मिशन मंगळयान’ संपुष्टात आलं आहे. कारण, मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी पाठवलेल्या मंगळयानाचे इंधन आणि बॅटरी संपल्याचं स्पष्ट झालं आहे. आठ वर्षांनी मंगळयानशी संपर्क तुटल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इसरो ) जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१३ साली मंगळयान हे उपग्रह भारताने सोडले होते. सहा महिन्यांचा कालावधी गृहीत धरून हे उपग्रह तयार करण्यात आले होते. मात्र, मंगळाच्या भोवती हे उपग्रह आठ वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिले. अलिकडेच मंगळावरती एकामागे एक अनेक ग्रहण झाली. यातील एक ग्रहण हा ७ तास १० मिनिटे चालले. उपग्रहाची बॅटरी ही केवळ १ तास ४० मिनिटे ग्रहणामध्ये काम करू शकते. दीर्घ ग्रहणाने उपग्रहाची बॅटरी सुरक्षित मर्यादा ओलांडून संपल्याने त्याने काम करणे बंद केले.

हेही वाचा – केजरीवाल सरकारकडून राष्ट्रपतींचा अवमान ; दिल्लीच्या नायब राज्यपालांचा आरोप

मंगळयान मोहिमेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबर २०२२ रोजी एक बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी उपग्रहातील इंधन व बॅटरी संपल्याने यानाला परत मिळवता येणार नाही. मंगळयान मोहिमेला एक उल्लेखनीय वैज्ञानिक किर्ती म्हणून ओळखण्यात येईल. या मिशनने मंगळाच्या पृष्ठभागची वैशिष्टे, वातावरण आणि बाह्यमंडळातील वायूंच्या संरचनेची माहिती मिळाली, असे इसरोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी म्हटलं.

हेही वाचा – संघ-भाजपविरोधात लढण्यासाठी सक्षम कोण? ; काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मुद्दा

४५० कोटी रुपयांत निर्मिती

भारताने हे उपग्रह ५ नोव्हेंबर २०१२ साली सोडले होते. २४ सप्टेंबर २०१४ ते मंगळाच्या कक्षेत पोहचले. केवळ ४५० कोटी रुपयांमध्ये या उपग्रहाची निर्मिती झाली होती. मंगळाच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, आकारविज्ञान, खनिजपदार्थ आणि मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे उपग्रह मंगळाच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars orbiter craft non recoverable mangalyaan mission over confirms isro ssa
First published on: 04-10-2022 at 08:07 IST