संभलपूर (ओडिशा) : देशातील असहाय्य नागरिकांना मोदी हमी ही अखेरची आशा आहे. ओडिशाच्या सर्वांगिण विकासाठी भाजप वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी येथील कार्यक्रमाद्वारे राज्यात पक्षासाठी वातावरण निर्मिती केली.

राज्यात २०१९ नंतर ही पहिलीच पंतप्रधानांची राजकीय सभा होती. यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मतपेढी म्हणून काँग्रेसने जनतेचा वापर केला. तर भाजपने अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासाला प्राधान्य दिले. विकासकामांसाठी ही तरतूद गेल्या दहा वर्षांत सरकारने वाढवल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

हेही वाचा >>> झारखंडमध्ये जनादेश डावलण्याचा भाजपचा प्रयत्न; राहुल गांधी यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सभेपूर्वी पंतप्रधानांनी शनिवारी ओडिशामध्ये ६८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आयआयएम, संभलपूरच्या  कॅम्पसचे उद्घाटन करण्याव्यतिरिक्त, त्यांनी राज्यातील ऊर्जा, रस्ते आणि रेल्वे यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे अनावरण केले.  पंतप्रधानांनी २०२१ मध्ये त्यांनी आयआयएम कॅम्पसची पायाभरणी केली होती. राज्यातील १८ प्रकल्पांचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, ‘‘या प्रकल्पांमुळे ओडिशातील तरुणांना फायदा होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केंद्र सरकार ओडिशाला प्रत्येक क्षेत्रात मदत करत आहे.’’  देशातून विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतील. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेतही सुधारणा होईल आणि संभलपूर हे शिक्षणाचे केंद्र बनेल,’’ मोदी म्हणाले.