नवी दिल्ली : भारतातील वायव्येकडील काही भाग आणि द्वीपकल्पीय क्षेत्र वगळता देशाच्या बहुतांश भागांत एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असा इशारा हवामान खात्याने शनिवारी दिला. या कालावधीत मध्य, पूर्व आणि वायव्य भारताच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट येईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा एप्रिल ते जून या उष्ण हवामानाच्या कालावधीत देशाचा दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेश आणि वायव्येकडील काही भाग वगळता बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहील. वरील भागांत सामान्य किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most parts of india to face above normal temperatures between april to june says imd zws
First published on: 02-04-2023 at 05:03 IST