पीटीआय, श्रावस्ती (उत्तर)

सपा आणि काँग्रेस<strong> सत्तेवर आल्यास सरकारने बांधलेली घरे काढून घेणे, लोकांची जनधन खाती बंद करणे, त्यांची वीज जोडणी तोडणे, पाण्याचे नळ काढून टाकणे अशी कामे करून देशाला पिछाडीवर नेण्याचे कार्य करतील, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत कल्याणकारी योजनांना खीळ बसण्याची चिंता व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील भाजपचे उमेदवार साकेत मिश्रा यांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीत मोदी बोलत होते.

The Central Public Service Commission itself has admitted that Pooja Khedkar has cheated
पूजा खेडकरांकडून फसवणूक; केंद्रीय लोकसेवा आयोगाचीच कबुली; नियुक्ती रद्द होण्याची चिन्हे
Suvendu Adhikari oppose pm narendra modi slogan
Suvendu Adhikari : ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा बंद करा, भाजपा नेत्याचे आव्हान; म्हणाले, “अल्पसंख्याकांना…”
Congress leader K C Venugopal gets Apple alert about mercenary spyware attack
‘सरकारकडून हेरगिरी!’ काँग्रेस नेत्याचा आरोप; ॲपल कंपनीने पाठवलेल्या इमेलमध्ये काय म्हटलंय?
british pm keir starmer marathi news
विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!
Keir Starmer
ब्रिटनमध्ये मजूर पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार… कीर स्टार्मर!
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
tmc mla hamidul rahaman
“मुस्लीम राष्ट्रात असंच…”, जोडप्याला मारहाण प्रकरणी तृणमूलच्या आमदाराचे अजब विधान
Supriya Sule
“लोकसत्ताक देशात पोलिसराज प्रस्थापित करण्यासाठी…”, नव्या फौजदारी गुन्ह्यांवरून सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “संसदेत…”

‘इंडिया आघाडी’ हा कर्करोगापेक्षाही भयंकर आजार असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्ष कट्टर जातीयवादी आणि कुटुंबकेंद्रित आहेत. हे आजार देशासाठी कर्करोगापेक्षाही भयंकर आहेत, असेही ते म्हणाले. ‘जेव्हा लोक त्यांना विचारतात की त्यांनी गेल्या ६० वर्षांत काय केले, तेव्हा ते त्यांच्या पत्त्यांचा एक्का काढतात, जे समाजात फूट पाडण्यासाठी आणि मत जिहाद करण्यासाठी आहेत,’ मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>धार्मिक भावना दुखवू नका ! संविधानावर बोलू नका !! नड्डा, खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र

भारतीय गटातील पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, ‘‘काँग्रेस म्हणते देशाच्या मालमत्तेवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. पण मोदी म्हणतात की, देशातील गरिबांचा संपत्तीवर पहिला हक्क आहे.’’ काँग्रेसला तुमची कमाई हिसकावून घ्यायची आहे व ती आपल्या मतपेढीला द्यायची आहे जी व्होट जिहादमध्ये गुंतलेली आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले. २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात श्रावस्तीमध्ये मतदान