श्रीराम क्षत्रिय तर भगवान कृष्ण ओबीसी होते, अशा शब्दांत त्यांना जातीची लेबलं लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानकर्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचे वादग्रस्त विधान गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे. शनिवारी गांधीनगर येथे ब्राह्मण बिजनेस समिटमध्ये ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्रिवेदी म्हणाले, ब्राह्मण समाज कधीही सत्तेचा भुकेला नव्हता उलट त्यांनी कित्येक राजांना त्यांच्या यशामध्ये योगदान दिले आहे. चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि भगवान कृष्ण यांच्या यशातही ब्राह्मणांचेच योगदान होते. ब्राह्मणांनीच देवांना बनवले आहे. श्रीराम हे क्षत्रिय होते मात्र, त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण ऋषी, मुनींचे योगदान होते. तसेच कृष्ण ओबीसी होते त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण सांदिपनी ऋषींचे योगदान होते. ब्राह्मणांनी संस्कृती भाषेचे रक्षण केले असून मत्सकन्येचे पुत्र भगवान व्यासांना देखील ब्राह्मणांनीच देव बनवले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi and dr ambedkar brahmin ram and krishna gave divinity from brahmins
First published on: 29-04-2018 at 15:58 IST