संसदेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून, विरोधकांवर कोरडे ओढले आहे. लोकशाही कोणा एकाच्या मर्जी आणि आवडीवर चालू शकत नाही. गदारोळामुळे देशातील गरिबांचे नुकसान होत आहे, असे मोदी म्हणाले. दिल्लीत ‘जागरण मंच’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संसदेत केवळ जीएसटी विधेयक नाही, तर देशातील गरिबांच्या हिताशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं रखडली आहेत. गोंधळामुळे संसदेचे कामकाज होत नसल्याने मी अतिशय दु:खी आहे. विकासासाठी खाजगी, वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रांना चालना देण्याची गरज असून, आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही दररोज एक कायदा कमी करण्याच्या विचारात आहोत. फक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करून सरकारच्या प्रयत्नांना सर्वसामान्य नागरिकांनी साथ द्यावी, अशी अपेक्षा असल्याचेही मोदींनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
लोकशाही कोणाच्या मर्जीवर चालू शकत नाही- पंतप्रधान
गोंधळामुळे संसदेचे कामकाज होत नसल्याने मी अतिशय दु:खी
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 10-12-2015 at 12:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not just gst stuck in parliament matter of sorrow says pm narendra modi