ओडिशातील जगन्नाथ पुरीचे पंडीत काशिनाथ मिश्रा यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या भगवान कल्कींच्या धर्म स्थापनेचा काळ सुरू आहे. तसेच आगामी २०२४ च्या निवडणुकीत भारताचा शेवटचा पंतप्रधान होईल, असा दावा काशिनाथ मिश्रा यांनी केला. भविष्य पुराणाचा संदर्भ देत त्यांनी हा दावा केला. तसेच त्या पुराणात भारताच्या सर्व पंतप्रधानांविषयीही माहिती असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.

काशिनाथ मिश्रा म्हणाले, “भविष्य पुराणात भारताच्या सर्व पंतप्रधानांविषयी लिहिलं आहे. तसेच उडिशाच्या सर्व मुख्यमंत्र्यांविषयी लिहिलं आहे. भविष्य पुराणात लिहिलं आहे की, भगवान कल्कीची धर्म स्थापना होईल तेव्हा योग करणारा किंवा नावात योगी असणारा भारताचा शेवटचा पंतप्रधान होईल. सध्या तो काळ (२०२४) सुरू आहे.”

हेही वाचा : जिंकणार भाजपच, पण शक्तिपात होतोय तो भाजपचाच… 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भगवान कल्कींच्या काळात महायुद्ध होईल”

“भगवान कल्कींच्या शासनाच्या काळात महायुद्ध होईल, असंही भविष्य पुराणात लिहिलं आहे,” असंही काशिनाथ मिश्रा यांनी नमूद केलं.