ओडिशातील जगन्नाथ पुरीचे पंडीत काशिनाथ मिश्रा यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या भगवान कल्कींच्या धर्म स्थापनेचा काळ सुरू आहे. तसेच आगामी २०२४ च्या निवडणुकीत भारताचा शेवटचा पंतप्रधान होईल, असा दावा काशिनाथ मिश्रा यांनी केला. भविष्य पुराणाचा संदर्भ देत त्यांनी हा दावा केला. तसेच त्या पुराणात भारताच्या सर्व पंतप्रधानांविषयीही माहिती असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.

काशिनाथ मिश्रा म्हणाले, “भविष्य पुराणात भारताच्या सर्व पंतप्रधानांविषयी लिहिलं आहे. तसेच उडिशाच्या सर्व मुख्यमंत्र्यांविषयी लिहिलं आहे. भविष्य पुराणात लिहिलं आहे की, भगवान कल्कीची धर्म स्थापना होईल तेव्हा योग करणारा किंवा नावात योगी असणारा भारताचा शेवटचा पंतप्रधान होईल. सध्या तो काळ (२०२४) सुरू आहे.”

Vijay Vadettiwars challenge to Dharmaraobaba Atram
“भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे दिल्यास राजकारण सोडणार, अन्यथा तुम्ही सोडा,” विजय वडेट्टीवार यांचे धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान
cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Why Nitin Gadkari said If BJP government comes will some be sent to Pakistan in front of Prime Minister Narendra Modi
“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…

हेही वाचा : जिंकणार भाजपच, पण शक्तिपात होतोय तो भाजपचाच… 

“भगवान कल्कींच्या काळात महायुद्ध होईल”

“भगवान कल्कींच्या शासनाच्या काळात महायुद्ध होईल, असंही भविष्य पुराणात लिहिलं आहे,” असंही काशिनाथ मिश्रा यांनी नमूद केलं.