Operation Sindoor Latest Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. तसेच त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. सैन्यदलांनी पत्रकार परिषद घेत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं स्पष्ट केलं. तसेच पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही भारताने दिला आहे.
दरम्यान, त्यानंतर सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पाकिस्तानला सूचक इशारा दिला. भारत आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही, पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती. पण भारतानं पाकिस्तानच्या छातीवरच वार केला, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरील आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील बातम्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Operation Sindoor Latest Updates Live : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरील आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील बातम्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
भारत व पाकिस्तान यांच्या DGMO बैठकीत नेमकं काय ठरलं? दोन्ही बाजूंची कोणत्या मुद्द्यांवर सहमती झाली?
PM Modi : "…तर एकदिवस तेच पाकिस्तानचं अस्तित्व संपवतील", पंतप्रधान मोदींचा सूचक इशारा
PM Modi Top 10 Quotes : "भारत आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही", 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान मोदींचं पहिलं भाषण; वाचा १० महत्त्वाची विधाने
"यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिले जाईल. कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल", अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच सोमवारी जाहीर भाष्य केले. दहशतवादी आणि त्यांना थारा देणारे सरकार यांना आम्ही वेगळे मानत नाही, असेही पंतप्रधानांनी ठणकावले.
भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंनी सीमेवरील सैन्य कमी करण्यास सहमती दर्शविली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या भारताच्या सीमेवर ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर न्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव काहीसा कमी झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंनी सीमेवरील सैन्य कमी करण्यास सहमती दर्शविली असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
(फोटो-संग्रहित छायाचित्र)