ग्रामीण भागात पायाभूत सोयी निर्माण करण्यासाठी आणि नोकऱ्या पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन विधेयकाला विरोध करणे म्हणजे विकासाला विरोध होय, असे सांगून सरकारने या विधेयकाचे जोरदार समर्थन केले आहे.
भूसंपादन, योग्य मोबदला आणि पुनर्वसन विधेयकाला विरोध करणे म्हणजे देशाच्या विकासाला विरोध करणे आहे. देशाला विकासाची आवश्यकता आहे हे सर्वानी समजून घ्यायला हवे, असे नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) कार्यक्रमात बोलताना सांगितले.
ग्रामीण भागातील मुला-मुलींना नोकरीच्या संधी हव्या आहेत. मात्र सिंचन प्रकल्पांसाठीही सर्वसंमती आवश्यक आहे. प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना नोकरी देणे नव्या विधेयकात अनिवार्य करण्यात आले आहे. जुन्या विधेयकात ते नव्हते, याकडे नायडू यांनी लक्ष वेधले. २०१३च्या भूसंपादन विधेयकाला दुरुस्त्यांसह हे विधेयक संमत करणे हे मोठे आव्हान असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली या वेळी म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2015 रोजी प्रकाशित
भूसंपादन विधेयकाला विरोध हा विकासाला विरोध – नायडू
ग्रामीण भागात पायाभूत सोयी निर्माण करण्यासाठी आणि नोकऱ्या पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन विधेयकाला विरोध करणे म्हणजे विकासाला विरोध होय,

First published on: 07-04-2015 at 12:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition to land acquisition bill affect development says venkaiah naidu