कंबोडिया देशात भारतीयांकडून बळजबरीने साबयर गुन्हे करून घेतले जात असल्याच्या १३० तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सरकारने भारतीय नागरिकांना सोडविण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानंतर कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह शहरातील भारतीय दूतावासाने ७५ भारतीयांची सुटका केली आहे. दूतावासाचे द्वितीय सचिव अवरान अब्राहम यांनी ही माहिती दिली.

कंबोडियात जवळपास ५००० भारतीय नागरिकांकडून बळजबरीने सायबर गुन्हे करवून घेतले जात आहेत, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. सरकारच्या अंदाजानुसार, मागील सहा महिन्यात या सायबर गुन्हेगारीतून सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियामध्ये अडकलेले नागरिकांकडून भारतीय लोकांनाच लुटण्याचे काम केले जाते. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम या लोकांकडून करून घेतले जाते.

Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Indian Olympic Association President PT Ushashad issued a notice to the members sport news
कार्यकाळ संपल्याची नोटीस, धमक्यांची पत्रे, अतिरिक्त खर्च आणि बरेच काही! ‘आयओए’ बैठकीत अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित
seven women burnt by firecrackers during Ganpati immersion in umred
Video : फटाक्यामुळे ७ महिला भाजल्या, नागपुरातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मरवणुकीतील दुर्घटना
2 crore fraud with company, fake invoices fraud,
मुंबई : बनावट पावत्यांद्वारे कंपनीची पावणेदोन कोटींची फसवणूक
Karnataka man return to india from russia
“आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!
police file case for forcing girl to perform obscene act in shelter home
धक्कादायक : लेस्बियन असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर बळजबरी, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर सुरक्षा तज्ज्ञांची बैठक बोलावून कंबोडियामध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी धोरण निश्चित केले होते.

अब्राहम यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, कंबोडियाच्या विविध भागातून दररोज चार ते पाच तक्रारी फोनद्वारे येत आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना याची माहिती देतो. तसेच या लोकांनी दूतावासापर्यंत कसे पोहोचावे, याचे मार्गदर्शन करत आहोत. अनेक लोक मानसिक धक्क्यात असल्यामुळे त्यांना समुपदेशन देण्याचेही काम आम्ही करत आहोत. अब्राहम पुढे म्हणाले की, जेव्हा कंबोडियात अडकलेल्या लोकांची सुटका केली जाते, तेव्हा ते भारतात जाऊन एफआयआर दाखल करत नाहीत, ही एक मोठी अडचण आहे. जर त्यांनी एफआयआर दाखल केले तर भारतीय पोलीस एजंट आणि कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतात.

आम्ही केंद्रीय गृहखात्याच्या संपर्कात आहोत. आम्हाला जेव्हा जेव्हा एखाद्या एजंटची माहिती मिळते, तेव्हा आम्ही ती भारताला देतो. जर सुटका झालेल्या लोकांनी एफआयआर दाखल करण्यास सुरुवात केली, तरच पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकतील, असेही अब्राहम म्हणाले.

भारतीय नागरिक कंबोडियात कसे अडकले?

भारतीय नागरिक कंबोडियाच्या सायबर गुन्हेगारीच्या चक्रात कसे फसतात, याबद्दल माहिती दिली आहे. कंबोडियात डेटा एंट्रीची नोकरी आहे, असे समजून अनेक लोक इथे येतात. पण एजंटकडून त्यांची दिशाभूल झाल्याचे समजल्यानंतर आपण इथे येऊन एका जाळ्यात अडकलो असल्याचे लक्षात येते. तरीही अनेकजण या जाळ्यातून तात्काळ बाहेर पडू शकत नाहीत. बहुतेक लोक गरीब पार्श्वभूमीतून आलेले असतात. त्यांच्यापैकी काहींनी एजंटना नोकरीसाठी मोठी रक्कम दिलेली असते. ही रक्कम इथे राहून ते कशीतरी वसूल करतील आणि नंतर बाहेर पडतील, असा विचार अेक लोक करतात.