एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या गटाने सुरू केलेला पक्ष कुणाचा हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय रचनेची थट्टा आहे असा युक्तिवाद आज कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केला. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर आपला उर्वरित युक्तिवाद मांडला. कपिल सिब्बल यांचं आजही हेच म्हणणं होतं की काही आमदार खासदार सोडून गेले म्हणून पक्ष फुटलेला नाही. या सगळ्यांनी पक्ष सोडला असला तरी पक्ष दुभंगलेला नाही. पक्ष जागेवरच आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना पक्ष कुणाचा? या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस निवडणूक आयोगासमोर होता. १० जानेवारी, १७ जानेवारी त्यानंतर २० जानेवारीला म्हणजेच आज निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू होती. मागच्या वेळी ठाकरे गटाने पुढची तारीख मागून घेतली होती. शिंदे गटाने राष्ट्रीय कार्यकारिणी ही निवडणूक आयोगात जाण्यापूर्वी एक दिवस आधी घेतली त्याला काहीही अर्थ नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. शिवसेनेची घटना मान्य नाही हे कोणत्या आधारांवर ठरवलं आहे? असा युक्तिवादही निवडणूक आयोगासमोर करण्यात आला. तसंच हा सगळा वाद म्हणजे देशाच्या लोकशाही रचनेची थट्टा आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. ठाकरे गट म्हणजेच राजकीय पक्ष हा योग्य आहे असंही सांगण्यात आलं. आज कपिल सिब्बल यांनी सुमारे एक तास युक्तिवाद केला. शिंदे गटाची आत्तापर्यंत झालेली कार्यवाही ही शिंदे गटाकडे आहे का? कागदावर ही कार्यवाही आहे का? असं म्हणत शिंदे गटाच्या कार्यकारिणीलाही कपिल सिब्बल यांनी आव्हान दिलं आहे.

yogi adityanath
“काँग्रेसला अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार द्यायचा आहे”, योगी आदित्यनाथ यांची टीका!
Rahul Gandhi criticizes Narendra Modi at Vijayapura in Karnataka
पंतप्रधान घाबरले आहेत, कदाचित अश्रू ढाळतील; राहुल गांधी यांची मोदींवर टीका
Supreme Court notice to Election Commission to hold fresh poll if NOTA gets more votes
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; ‘नोटा’ला जास्त मते मिळाल्यास नव्याने मतदान घेण्याविषयी विचारणा
no alt text set
मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली

कपिल सिब्बल यांनी हेदेखील म्हटलं आहे की जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी बंड केलं होतं तर निवडणूक आयोगाकडे जाण्यासाठी एक महिना का लावला? राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाची कार्यकारिणी ही बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरे कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

मागच्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत फूट पडली आहे. त्यानंतर अंधेरीची जी पोटनिवडणूक झाली त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरच दावा सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगासमोर हा वाद गेला. या दोन गटांचा वाद सुरू झाल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि नावही गोठवलं. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं गेलं. तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. आता निवडणूक आयोगासमोर या दोन्ही गटांची सुनावणी सुरू आहे. मात्र या दोघांमधला वाद म्हणजेच भारतीय लोकशाही रचनेची थट्टा आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.