श्रीनगर : ‘‘जम्मू-काश्मीरमधील सध्याची अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही आमची जमीन काबीज करण्याचा व लोकसंख्येच्या प्रमाणात मोठे बदल घडवण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांच्या बेरोजगारी व सुरक्षेच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी केंद्राने स्थानिक रहिवाशांना येथून हटवण्यास प्राधान्य दिले आहे,’’ असा आरोप पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) रविवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी प्रसिद्ध झालेल्या ‘स्पीक अप’ या आपल्या मासिक मुखपत्रात पक्षाने म्हटले, की गेल्या तीन वर्षांत आम्हाला केंद्राकडून केवळ जमीन कायद्यांत सुधारणा मिळाल्या आहेत. कारण भारत सरकारसाठी ही फक्त नेहमीच जमीन असेल. लडाखवासीय अनुच्छेद ३७० रद्द केल्याने आधी आनंदी होते. मात्र, ते पश्चात्ताप करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pdp allegations on centre for targeting kashmiris in the name of encroachments zws
First published on: 06-02-2023 at 02:36 IST