पीटीआय, नवी दिल्ली

राजकीय पक्षांच्या निधीसाठी निवडणूक रोखे योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका घटनापीठाकडे पाठवता येतील का याचा विचार केला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. या याचिका घटनापीठाकडे पाठवायच्या किंवा नाही याबाबत ११ एप्रिल रोजी निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

Supreme Court asks poll panel about penalties for EVM manipulation
घडयाळाचे काटे उलटे फिरवू नका! मतपेटीद्वारे गुप्त मतदानाच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
Supreme Court grants bail to YouTube vlogger arrested on charges of insulting Tamil Nadu Chief Minister MK Stalin
निवडणुकीआधी किती जणांना तुरुंगात टाकणार? सर्वोच्च न्यायालयाकडून ‘यूटय़ूब व्लॉगर’ला जामीन देताना विचारणा
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर

याबाबत जनहित याचिका करणाऱ्याच्या वकिलाने सांगितले की, आतापर्यंत १२ हजार कोटी रुपये राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे दिले गेले आहेत आणि दोनतृतीयांश रक्कम एका प्रमुख राजकीय पक्षाकडे गेली आहे आणि त्यामुळे आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणावर लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. याप्रकरणी अधिकृत घोषणा होणे आवश्यक असल्याने या याचिकाकर्त्यांने सांगितले. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, याचिका ११ एप्रिल रोजी घटनापीठाकडे पाठवता येतील की नाही याबाबत सांगण्यात येईल.