जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला क्रिकेट सामना पाहायला गेले, मात्र हिंसाग्रस्त मणिपूरला ते गेले नाहीत अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय झाल्यास त्याचे श्रेय घेण्यासाठी मोदी गेले होते असा दावाही प्रियंका यांनी केला.

हेही वाचा >>> गांधी कुटुंबाला पापांची किंमत चुकवावी लागेल; ‘नॅशनल हेराल्ड’च्या मालमत्ता जप्त केल्यानंतर भाजपची टीका

Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
Odisha army officers fiance sexual assault news
Priyanka Gandhi : ओडिशातील ‘त्या’ घटनेवरून राहुल गांधींसह प्रियांका गांधींचं भाजपा सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “यांचं सरकार पोलिसांना…”
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित

राजस्थानातील शाहपुरा येथे प्रचारसभेत बोलताना प्रियंका म्हणाल्या, की ‘‘अलिकडेच विश्वचषकामध्ये आपला संघ स्वत:च्या कष्टाने अंतिम सामन्यात पोहोचला. संघ जिंकला तर त्याचे श्रेय आपल्यालाही घेता येईल या विचाराने मोदी तिथे पोहोचले’’. जिथे अभिमान आणि सन्मानाची बाब असते तिथे पंतप्रधान जातात पण संकटाच्या परिस्थितीपासून ते दूर राहतात अशी टीका त्यांनी केली.

पुढे प्रियंका यांनी प्रश्न विचारला, की मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात तर मग त्यांच्या कार्यकाळात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष कसा झाला? पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार मोठया उद्योजकांचे कर्जे माफ करते पण गरिबांकडे दुर्लक्ष करते या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.