नव्या परीक्षा पद्धतीच्या अंमलबजावणीनंतर प्रशासकीय सेवांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीएससी प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे आवाहन लोक जनशक्ती पार्टीतर्फे करण्यात आले. या पक्षाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी एका पत्राद्वारे ही विनंती केली आहे. सीसॅट परीक्षा पद्धती ही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणारी असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा हिंदी अनुवादही अत्यंत सुमार दर्जाचा असतो, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप पत्रात नोंदविण्यात आला आह़े