आपल्या उपरोधिक ट्विट्स मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधणारे कवी संपत सरल यांनी निकालच्या दिवशी काही ट्विट केलं नसतं तरच नवल. आज त्यांनी जे ट्विट केलं आहे ते सगळ्याच मोदी भक्तांना झोंबणारं आहे. आजचे निकाल पाहून मोदी भक्तांचा जळफळाट झाला असेलच त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बरनॉल घेण्यासाठी रांगा लावाव्यात म्हणजे त्यांना ते लवकर मिळेल आणि स्वस्त मिळेल. जसजसे कल आणि निकाल येत आहेत तस तसे बरनॉलचे दर वाढत आहेत. स्वस्तात बरनॉल हवं असेल तर लवकरात लवकर मोदी भक्तांनी रांगा लावाव्यात असेही संपत सरल यांनी म्हटले आहे. मोदी भक्तांच्या जखमेवर मीठ चोळणारेच हे ट्विट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच काही वेळापूर्वीच संपत सरल यांनी निवडणुका आणि भाजपा हे शांततेच्या मार्गाने संपले आहेत असेही ट्विट केले आहे. संपत सरल ट्विट करताना किंवा कविता करतानाही कायमच मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. त्यामुळे आजही त्यांचे हे दोन ट्विट मोदी सरकारवरच निशाणा साधणारे होते. आजच्या ट्विटमध्ये त्यांनी भक्तांवरही निशाणा साधला आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे भाजपाचा विजयी रथ काँग्रेसने रोखल्याचे चित्र आहे. कारण पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित आहे. मध्य प्रदेशात काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet samat saral tweets against modi government
First published on: 11-12-2018 at 18:31 IST