scorecardresearch

Premium

नितीशकुमार दगाफटका करण्यात माहीर, बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य-संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य

नितीशकुमार दगाफटका करण्यात माहीर, बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य-संजय राऊत

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा ते चटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पिक येणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सद्यस्थितीत नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर त्यांना भाजपाचं मांडलिक व्हावं लागेल. नितीश कुमार यांच्या स्वभावाला ते साजेसं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा ते निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होणं शक्य आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नितीशकुमारांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत दगाफटका केला. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि ते तर सत्तेत होते लालूप्रसाद यादव यांच्यासोबतही त्यांनी दगा केला. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे नितीशकुमार नेमकं काय करतील याची शाश्वती आत्ता तरी देता येत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Nana-Patole
काँग्रेस पक्षात गटबाजी नाही, तर रविंद्र धंगेकर आजारी असल्याने बैठकीला आले नाही : नाना पटोले
What-is-the-Delhi-liquor-case-AAP-Leader-Sisodiya-and-Sanjay-Singh
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण काय आहे? ‘आप’ नेत्यांवर ईडीने कोणते आरोप केले आहेत?
Nana Patole criticize devendra fadnavis
राज्यात शांतता राखण्यात फडणवीस अपयशी – नाना पटोले
gajendra singh shekhawat
सनातन धर्मावरील वाद मिटेना ! DMK च्या उदयनिधी, के. पोनमुडी यांच्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान !

टीव्ही नाइन मराठीशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांना चिराग पासवान यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शाह यांच्या शब्दाबाहेर असतील असं वाटत नाही. पासवान यांना आवर घालणं शक्य नव्हतं असं कोण म्हणेल? मोदी आणि शाह यांनी मनात आणलं असतं तर त्यांचं बंड मोडूनही काढलं असतं मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांचं किमान २० जागांवर तरी नुकसान केलं असंही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याबद्दल विचारलं असता महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. नारायण राणेंनी ऑपरेशन लोटस होणार सांगितलं असलं तरीही महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे व्यवस्थित चालेल असा दावा संजय राऊत यांनी केला.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political earthquake may possible soon in bihar says sanjay raut scj

First published on: 13-11-2020 at 19:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×