हिंदी चित्रपट सृष्टीमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. सुशांतने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने एकच खबळबळ उडाली असून अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्याही समावेश आहे.

तो माझ्या पटणा शहरातून होता. त्याला मी राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यान भेटलो होतो. त्याने त्याचे कुटुंब पटण्यामधील राजीव नगर येथे राहत असल्याचं मला सांगितलं होतं. त्याच्या समोर अजून बरचं आय़ुष्य होतं. खूप लवकर गेला
– रवि शंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

तो इतकं चांगलं काम करत होता. त्याने असं का केलं असावं
– सबमित पात्रा, भाजपा प्रवक्ते

त्याच्याकडे अजून बरचं आयुष्य शिल्लक होतं. गप्पा मारण्यासाठी अगदी छान व्यक्ती होता. त्याचं अशा पद्धतीने जाणं मनाला चटका लावणारं आहे
– राज्यवर्धन सिंग राठोड

माझ्याकडे शब्दच नाहीयत मांडण्यासाठी. अशापद्धतीने तो का गेला?
-स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री

धक्काच बसला आहे. सद्भभावना कुटुंबाबरोबर आहेत
– असलम शेख, काँग्रेस नेता

तो तरुण आणि मल्टी टॅलेण्टेड होता. आपण मानसिक आरोग्याची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.
– पियुष गोयल

एवढ्या तरुण वयात हा टोकाचा निर्णय घेतला
अशोक चव्हाण</p>

‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वाबरोबर त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.