वंचित बहुजन आघाडीने शनिवारी (२५ नोव्हेंबर) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (दादर) संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं आहे. उद्या देशभरात संविधान दिन साजरा केला जाणार आहे. या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचितने ही महासभा बोलावली आहे. वंचितने या सभेसाठी देशातील अनेक विरोधी पक्षांना आणि नेत्यांना या सभेचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेत देशाचं संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय आणि सद्यस्थिती यावर चर्चा केली जाईल. या सभेतून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देशातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारवर आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी या सभेसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनादेखील निमंत्रण दिलं आहे. राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. परंतु, त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून या सभेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
sharad pawar, pm narendra modi
“पंतप्रधान मोदींच्या अगाध ज्ञानाचं…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा टोला!
assembly election 2024 Prakash Ambedkar announced he will fight independently along with OBC organizations
विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा! म्हणाले…
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
MLA sanjay gaikwad rahul gandhi should apologized to Babasaheb Ambedkar
बुलढाणा : “राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी, तरच…’ संजय गायकवाड यांनी सुचवला पर्याय

राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, संविधान सन्मान महासभेचं निमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. तसेच संविधान दिनानिमित्त तुम्ही ही महासभा आयोजित केल्याबद्दल तुमचं आणि वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन करू इच्छितो. आपण आज एका गभीर परिस्थितीता सामना करत आहोत. आपण गेल्या नऊ वर्षांमध्ये आपल्या घटनात्मक मूल्यांवर हल्ला होताना पाहिलं आहे. आपल्या बलाढ्या देशाचा पाया रचणाऱ्यांच्या विचारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याची आता नितांत गरज आहे.

राहुल गांधी हे सध्या तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या कामांत व्यस्त आहेत. त्यामुळे ते मुंबईत संविधान सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, दुर्दैवाने माझ्या चालू असलेल्या मोहिमेमुळे मी या सभेला उपस्थित राहू शकणार नाही. मी वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि तुमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो.

हे ही वाचा >> “पंतप्रधान मोदी आधी इस्रायलबरोबर होते, आता…”, संजय राऊतांचा टोला; ज्यूंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण देत म्हणाले…

प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण देताना काय म्हटलं होतं?

सध्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा मिळून संविधानिक मूल्ये आणि आदर्श नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, वंचित बहुजन आघाडी या आमच्या पक्षाच्या वतीने मी तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतो, या निमित्ताने तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन तथा भूमिका मांडण्याची संधी मिळेल.