देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि काँग्रेसकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून विरोधक एकत्र आले आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. २०२४ साली राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ही घोषणा केली आहे. तसेच, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्याचे संकेतही राय यांनी दिले आहेत.

Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
narendra modi sonia gandhi pti
“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन

“राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. प्रियंका गांधी वाराणसीतून लढण्यास इच्छूक असतील, तर त्यांच्या विजयासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जीव ओतून काम करतील. स्मृती इराणी १३ रुपयांमध्ये साखर होत्या. दिली का?” असा सवाल अजय राय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

हेही वाचा : काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या आमदारांना आता ‘घरवापसी’चे वेध

अमेठी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. याच मतदारसंघातून यापूर्वी संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी सलग तीन वेळा अमेठी मतदारसंघातून निवडून आले होते. पण, २०१९ साली स्मृती इराणी यांच्याबरोबर झालेल्या लढाईत राहुल गांधींचा ५५ हजार मतांनी पराभव झाला होता.

हेही वाचा : हरियाणातील जेजेपी पक्ष राजस्थानची विधानसभा निवडणूक लढवणार, काँग्रेसची अडचण वाढणार?

दरम्यान, २०१९ साली प्रियंका गांधी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात होतं. पण, शेवटच्या क्षणी अजय राय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर, २०१४ सालीही अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत अजय राय यांचा पराभव झाला होता.