अनेकदा मुलींचा बालविवाह होत असेल तर तिचे लग्न रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र राजस्थानमध्ये एका १९ वर्षीय मुलाने फोन करून त्याचा बालविवाह करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. हे प्रकरण दौसाच्या सिकराई येथील आहे. सोमवारी त्याचे लग्न होणार होते. पण त्याने राज्य बाल आयोगाला फोन करून याबाबत माहिती दिली आणि हे लग्न थांबवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार मुलगा बारावीचा विद्यार्थी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याने पुढे शिक्षण घ्यायचे असल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच बाल आयोगाने जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्याचे लग्न कायदेशीररित्या ठरवून दिलेल्या वयाच्या २१ व्या वर्षीच व्हावे, याकडे प्रशासनाला लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. राजस्थान बाल हक्क अध्यक्षा संगीता बेनीवाल यांनी सांगितले की, एखाद्या मुलाने फोन करून लग्न मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. बेनिवाल यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने फोन करून सोमवारी लग्न असल्याचे सांगितले होते. लग्नपत्रिकेच्या फोटोसोबत त्यांनी वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या गुणपत्रिकेचा फोटोही पाठवला होता. यानंतर बेनिवाल यांनी अधिकाऱ्यांना बोलावून लग्न थांबवण्याच्या सूचना दिल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan boy call child panel help to stop his wedding abn
First published on: 29-11-2021 at 13:39 IST