Crime News : लग्नाच्या पंगतीत पुरेसे पनीर वाढलं नाही म्हणून चिडलेल्या एका मिनी बस चालकाने चक्क लग्नाच्या मंडपात मिनी बस घुसवल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या चांदौली येथे शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
नवरदेवाच्या वडिलास इतर पाच जण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नवरीच्या चुलत्यांचाही समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
धर्मेंद्र यादव उर्फ ’बांबू’ असे मिनी बस चालकाचे नाव असून तो लग्नात आलेल्या वर्हाडी मंडळींना घेऊन आला होता. जेव्हा त्याने फूड काउंटरवर जास्त पनीर मागितले आणि त्याला ते देण्यात आले नाही तेव्हा तो चांगलाच संतापला आणि त्याने गाडी थेट मंडपात घुसवली.
यानंतर जखमी झालेल्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर यापैकी दोघांना बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे काही काळासाठी लग्न समारंभ खोळंबला. त्यानंतर शनिवारी रात्री नियोजित असलेले लग्न हे रविवारी सकाळी पोलीसांच्या मदतीने पार पडले.
आणखी एका विचित्र घटनेत नवरीची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेने फेब्रुवारीमध्ये एका साखरपुड्यात व्यत्यय आणला होता . यावेळी या महिलेने आरोप केला की त्या दोघी चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या आणि नवरी मुलीने तिचा अनेक वेळा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. नवरी मुलगी आणि ती महिला २०२१ मध्ये एकाच कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेत होत्या असे सांगितले जाते.