मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय, ज्याप्रमाणे तुम्ही मला आपलं मानलं, त्याप्रमाणे त्यालाही आपलं समजून सांभाळून घ्या, अशी भावनिक साद सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला घातली आहे. आज राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ रायबरेली मतदारसंघात इंडिया आघाडीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी हे भावनिक आवाहन केलं.

नेमकं काय म्हणाले सोनिया गांधी?

“आज बऱ्याच दिवसांनी मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली आहे. याचा मला आनंद आहे. मी मनापासून तुमची ऋणी आहे. तुम्ही मला २० वर्षे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. रायबरेली हे माझे कुटुंब आहे, त्याचप्रमाणे अमेठीही माझे घर आहे. माझ्या आयुष्यातील काही गोड आठवणी इथे जुळल्या आहेत. रायबरेली आणि अमेठीबरोबर आमच्या कुटुंबाचे गेल्या १०० वर्षांचे नाते जोडले आहेत”, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली.

bjp vs congress in haryana election
विश्लेषण : हरियाणात किसान, जवान, पहिलवान नाराज? मतदारांचा कौल कुणाला? भाजप सावध, काँग्रेस आशावादी…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
sharad pawar marathi news
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !
rahul gandhi criticized narendra modi
कंगना रणौत यांच्या माफीनाम्यानंतर राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना इशारा; म्हणाले, “जर पुन्हा कृषी कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, तर…”
atishi takes charge as delhi cm with empty chair
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार; कारण सांगत म्हणाल्या…
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!
sanjay raut reaction on amit shah mumbai statement
“बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

हेही वाचा – शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सोनियाविरोधी भूमिकेचं काय?

“इंदिरा गांधींच्या मनात रायबरेलीचे विशेष स्थान होतं”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “इंदिरा गांधींच्या मनात रायबरेलीचे विशेष स्थान होतं. मी त्यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांचं रायबरेलीच्या जनतेवर प्रेम होतं. पुढे इंदिरा गांधी आणि रायबरेलीच्या जनतेने मला जे शिकवलं तिच शिकवण मी राहुल आणि प्रियंका यांना दिली आहे.”

रायबरेलीच्या जनतेला भावनिक साद

यावेळी बोलताना त्यांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक सादही घातली. “मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय, ज्याप्रमाणे तुम्ही मला आपलं मानलं, त्याप्रमाणे त्यालाही आपलं समजून सांभाळून घ्या, राहुल तुम्हाला कधीही निराश करणार नाही”, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यांनी रायबरेलीच्या जनतेचे आभारही मानले. “रायबरेलीच्या जनतेने मला २० वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यासाठी मी रायबरेलीच्या जनतेचे आभार मानते”, असे त्या म्हणाल्या.