नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आलाय. यासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला नोटीस बजावली असून, चार आठवड्यात आपली बाजू प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
सरन्यायाधीश पी. सथाशिवम यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे खासदार गुरुदास दासगुप्ता यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करताना सरकारने या विषयाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
संसदेच्या ज्येष्ठ सदस्याने दाखल केलेल्या याचिकेवर अभ्यास करणे गरजेचे असून, ती प्राथमिक माहिती घेतल्याशिवाय फेटाळता येणार नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2013 रोजी प्रकाशित
नैसर्गिक वायू दरवाढ: सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि रिलायन्सला नोटीस
नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आलाय.
First published on: 29-07-2013 at 02:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court issues notices to centre ril on gas price