नवी दिल्ली : कुठल्याही उमेदवाराला एकाच वेळी एकाहून अधिक मतदारसंघांतून निवडणूक लढवण्यास मनाई करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. हा ‘कायदेविषयक धोरणाचा’ भाग आहे, असे न्यायालयाने सांगितले.

अनेक प्रकारच्या कारणांसाठी उमेदवार निरनिराळय़ा मतदारसंघांतून निवडणूक लढवू शकतात आणि त्याला असा पर्याय देऊन लोकशाही पुढे वाटचाल करू शकते काय हे ठरवणे संसदेच्या इच्छेवर अवलंबून आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले.

mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
supreme court
उमेदवारांनी प्रत्येक जंगम मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
supreme court and ajit pawar
अजित पवार गटाला सज्जड ताकीद! चिन्हाबाबत निर्देश तंतोतंत पाळा – सर्वोच्च न्यायालय

एखाद्या व्यक्तीला सार्वत्रिक निवडणूक किंवा पोटनिवडणुकांचा एक गट किंवा द्वैवार्षिक निवडणुका दोन मतदारसंघांतून लढवण्याची मुभा देणारे लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम ३३(७) हे अवैध आणि घटनाविरोधी असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी अ‍ॅड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेत केली होती.

‘एकापेक्षा अधिक जागेवरून निवडणूक लढवणारे उमेदवार अनेक प्रकारच्या कारणांसाठी असे करतात. एकापेक्षा अधिक जागेवरून उमेदवाराला निवडणूक लढण्याची परवानगी देणे हा कायदेविषयक धोरणाचा भाग आहे, कारण यातून देशातील राजकीय लोकशाही वर्धिष्णू होते काय हे ठरवणे अखेर संसदेच्या इच्छेवर आहे’, असे खंडपीठाने सांगितले.

न्यायालय काय म्हणाले?

लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१च्या ३३(७) कलमात कुठलाही उघड मनमानीपणा नसल्यामुळे, संबंधित तरतूद रद्द ठरवणे आपल्याला शक्य होणार नाही, असे न्यायालय म्हणाले.