नवी दिल्ली : मोदी सरकारने २०१४ मध्येच श्वेतपत्रिका प्रसिध्द करायला हवी होती, आता २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीआधी  करण्यामागे भाजपचा फक्त राजकीय हेतू असून ही श्वतपत्रिका म्हणजे भाजपचा निवडणूक जाहीरनामा आहे, असा आरोप काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी लोकसभेत शुक्रवारी केला.

गेल्या दहा वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था खाईतून काढून उंचीवर नेऊन ठेवल्याचा सीतारामन यांचा दावा विविध आकडेवारी देत तिवार यांनी खोडून काढला. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कालखंडातील आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना मनोज तिवारी यांनी बचत, ग्राहक उपभोग, उत्पन्न, गुंतवणूक आणि रोजगार या पाच क्षेत्रांतील तुलनात्मक आढावा घेत मोदी सरकारने मांडलेल्या श्वतपत्रिकेचे वाभाडे काढले.

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा

हेही वाचा >>>Pakistan Election 2024 : “आम्हीच विजयी, पण सत्ता स्थापनेसाठी…”, नवाझ शरीफांचं विधान; म्हणाले, “पाकिस्तानची पुनर्बांधणी…”

आर्थिक मुद्दय़ांवर काँग्रेसचे दावे

’ १३-१४ मध्ये बचतीचे प्रमाण ३४ टक्के होते, २२-२३ मध्ये ती ३० टक्के होती.

’ १३-१४ मध्ये गुंतवणूक ३४.८ टक्के होती, २३-२४ मध्ये २९.२० टक्के झाली.

’ मोदी सरकारच्या काळात बाजारातून कर्ज घेण्याचे प्रमाण १७ लाख कोटींवर पोहोचले. त्यामुळे खासगी क्षेत्राला बाजारातून निधी मिळाला नाही, खासगी क्षेत्राचा विकास खुंटला.

’ भांडवलनिर्मिती ३३.८ टक्क्यांवरून ३१.४ टक्क्यांवर आली.

’ बेरोजगारी २००४-१४ मध्ये हे प्रमाण ४.९ टक्के होती. आता सीएमआयईच्या आकडेवारानुसार २०२३मध्ये ती ८.९ टक्के झाली.

’ कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रमाण ८७.५ टक्के आहे.

’ १४-२४ मध्ये २५ कोटी गरिबीतून मुक्त झाले असतील तर, यूपीएच्या काळात २००४-१४ मध्ये २७ कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले.

’ अर्थव्यवस्था विस्तारत असताना महसूलवाढ झाली नाही. १० वर्षांमध्ये कर्जामध्ये वाढ होत राहिली. खर्च झालेल्या एका रुपयांत २८ पैसे कर्जातून खर्च झाले व २० पैसे व्याज देण्यात खर्च झाले.

’ रोजगारहमी योजनेवर १३-१४ मध्ये ३३ हजार कोटी खर्च झाले. २०२४ मध्ये ३२ हजार कोटी खर्च झाले.

’ रोजगारवाढ झाली नसल्याने ‘मनरेगा’ योजनेवर मोदी सरकारला अवलंबून रहावे लागले. या योजनेने केंद्र सरकारला गेल्या दहा वर्षांत वाचवले.

’ १३-१४ मध्ये अर्थव्यवस्था २.५ ट्रिलियन डॉलर होती, त्यामध्ये कर्ज ५५ लाख कोटी डॉलर होते. २३ मध्ये अर्थव्यवस्था ३.७५ ट्रिलियन डॉलर झाली, पण कर्ज दुपटीने वाढून १६८ लाख कोटी डॉलरवर पोहोचले.

’ ०५-१४ मध्ये विकासदर ६.८ टक्के होता तर १५-२४ या काळात तो ५.९ टक्के राहिला. यूपीएच्या काळात विकासदर जास्त होता तर ती आर्थिक दुरवस्था कशी?

’  ०४ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ५६ होते, रुपयाचे अवमूल्यन होऊन ते आता ८२ झाले आहे.

हेही वाचा >>>माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न मिळताच आरएलडीची मोठी घोषणा, इंडिया आघाडीला धक्का?

यूपीएच्या काळातील कामांचा पाढा

’ २००४ मध्ये सरकारी तूट ४.५ टक्के होती, ती ०७-०८ मध्ये २.८ टक्के झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंदीचे संकट ओढवले होते.

’ ०३-०४ मध्ये महसुली तूट ३.१० टक्के होती, ०७-०८ मध्ये ती १.०२ टक्के झाली.

’ ०३-०४ मध्ये बचतीचे प्रमाण २९.८ टक्के होती, ती वाढून ०७-०८ मदध्ये ३४ टक्के झाली.

’ ०३-०४ मध्ये जीडीपीच्या प्रमाणात गुंतवणूक २८.२ टक्के होती, ती वाढून ३५.९ टक्के झाली.

’ ९८-०४ या काळात हमीभावात फक्त ३० रुपयांची वाढ जाली, ०४-०८ या काळात हमीभाव ३०० रुपयांनी वाढले.

’ ९८-०४ मध्ये काळात महागाई ५.१५ टक्के होती, २००४-०८७ मध्ये ती ५.१२ टक्के राहिली.

’ ९९-०४ मध्ये सरासरी विकासदर ५.८ टक्के होता, तर २००४-१४ मध्ये तो ८.९ टक्के होता. तसेच यूपीएच्या काळातील गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल आणि दूध या यांचे दर आणि आताचे दर याचीही तुलना तिवारी यांनी सदनासमोर मांडली.