पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निमलष्करी दलाच्या ७० तुकड्या, १५ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण दिल्लीवर ड्रोन आणि ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सायबर तज्ज्ञ यावर लक्ष ठेवून असतील. प्रजासत्ताक दिनासाठी बहुस्तरावरील सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. सहा स्तरांवर तपासणी होणार आहे. याखेरीज, बहुस्तरीय बॅरिकेड बसविण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये हजारो सीसीटीव्ही विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत. कॅमेरा डेटाशी जोडण्यात आले असून, एखादा गुन्हेगार कॅमेऱ्याने टिपला, तर त्याची सर्व माहिती पोलिसांना तत्काळ कळणार आहे.

विविध सुरक्षा संस्थांबरोबर पोलिस सुरक्षेची चाचणी करीत आहेत. सर्व जिल्ह्यांचे पोलिस उपायुक्तांना सुरक्षेचे सादरीकरण केले आहे. पोलिसांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी चार हजार उंचावरील ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

150 traffic police deployed on alternate roads to avoid traffic jams on Shilpata road
शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसांची गस्त वाढली, जड, अवजड वाहनांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
thane tyre killer
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात टायर किलर
Mumbai City District Planning Committee meeting in the presence of Eknath Shinde
६९० कोटींच्या आराखड्यास मान्यता; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक
Navi Mumbai Police will open four new stations in six months due to airport expansion
नवी मुंबई पोलिसांना विस्ताराचे वेध, शहरात आणखी चार पोलीस ठाण्यांची वाढ
Palghar Police conducts special awareness campaign on the occasion of Road Safety Week
शहरबात: रस्ते आणि सुरक्षा
On Republic Day Dr ravindra singhal and others were awarded Presidents Medal for Distinguished Service
रवींद्र सिंगल, दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ४३ पदके
three cadet soldiers selected from Dada Patil College Karjat for Republic Day Camp
प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता नवी दिल्ली येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव कर्जत तालुक्याचा आवाज घुमणार
Story img Loader