scorecardresearch

“‘जय श्रीराम!’, ‘भारत माता की जय!’ या घोषणा देऊन सगळं…”; वरुण गांधींचा मोदी सरकारला सवाल

महागाई, उज्वला योजना या सगळ्या वरुन वरुण गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

What Varun gandhi Said?
वरुण गांधींचा मोदी सरकारला सवाल

लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात भाजपाचे खासदार वरुण गांधी हे मोदी सरकारविरोधातच तिखट प्रश्नांच्या फैरी झाडत आहेत. एकीकडे भाजपा २०२४ मध्ये पीलभीतमधून वरुण गांधींना तिकिट देणार का? याच्या चर्चा रंगलेल्या असताना वरुण गांधी हे मात्र मोदी सरकारला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारताना दिसत आहेत. भाजपाच्या घोषणा, सरकारी नोकरी, योजना या सगळ्यावरच वरुण गांधी यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे त्यांना बहुदा तिकिट दिलं जाणार नाही असंच दिसतं आहे. कदाचित ते वेगळी चूल मांडू शकतात अशीही चर्चा आहे. ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर टोकाची टीका केली आहे

काय म्हणाले वरुण गांधी?

वरुण गांधी म्हणाले, “मी भारत मातेला आपली माता मानतो. मी हनुमानाचा भक्त आहे, भगवान राम यांनाही मी देव मानतो. जय श्रीराम, भारत माता की जय या घोषणा देऊन काय होणार आहे? ज्या लोकांनी कर्ज काढलं आहे ते जर त्यांना फेडता आलं नाही तर त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल. या सगळ्याचा उपाय जय श्रीराम, भारत माता की जय या घोषणा नाहीत.”

Uddhav Thackeray Narendra Modi 2
“मोदी सरकारच्या ‘पार्टनर’ उद्योगपतीचा पर्दाफाश केला तेव्हा…”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
eknath shinde
ठाण्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम शिवसेनेकडून हायजॅक
obc reservation
ओबीसी आंदोलकांना सरकारचे चर्चेचे निमंत्रण; ओबीसी महासंघाची भूमिका काय?…
narendra modi rahul gandhi
VIDEO : “मी एखादी गोष्ट ठरवली तर…”, ‘त्या’ प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजपाला इशारा

आज पायाभूत सुविधांची गरज जास्त आहे. प्रत्येक व्यक्ती आज महागाईने त्रस्त आहे. अनेक तरुणांना नोकरी नाही, रोजगार नाही, उत्पन्न नाही. या समस्या कशा सुटणार? असाही प्रश्न वरुण गांधींनी विचारला आहे.

उज्ज्वला योजनेविषयी काय म्हणाले वरुण गांधी?

“उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत सात कोटी लोकांना सिलिंडर्स देण्यात आले. सध्या दुसरा सिलिंडर घ्यायची त्यांची ऐपत नाही. कारण सिलिंडर आता ११०० रुपयांचा झाला आहे. सामान्य माणसाने कसं जगायचं? “

सध्या सरकारी विभागांमध्ये एक कोटी पदं रिकामी आहेत. मी सांगत असलेली संख्या नाही तर सरकारने दिलेली संख्या आहे. जर एक कोटी पदं रिकामी आहेत तर ती भरली का जात नाहीत? तुम्हाला (मोदी सरकार) पैसे वाचवायचे आहेत का? जे लोक त्यांच्या परिस्थितीतून उभे राहू शकत नाहीत त्यांना आधार देणं सरकारचं काम आहे. १ कोटी पदं भरली गेली तर किती लोकांना संधी मिळेल तुम्हीच विचार करा. मात्र हे सरकार विचार करताना दिसत नाही असंही वरुण गांधी म्हणाले.

भाजपा खासदार वरुण गांधी म्हणाले मागच्या सात वर्षात महागाई प्रचंड वाढली आहे. केरोसीनच्या किंमती अडीचशे पटींनी वाढल्या आहेत. दुधाच्या किंमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. कांद्यांच्या किंमती ७० टक्के वाढल्या आहेत असंही वरुण गांधी यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Varun gandhi bjp pilibhit mp jai shri ram bharat mata ki jai slogans free ration unemployment scj

First published on: 21-11-2023 at 14:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×