जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या अहवालानुसार २०१६ या एका वर्षात भारतात प्रदूषण आणि विषारी वायू यामुळे १ लाख २५ हजार मुलांचा मृत्यू झाला. प्रदूषण आणि विषारी हवेचा परिणाम पाच वर्षांखालील मुलांवर सर्वाधिक झाल्याचंही WHO ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या संदर्भातला एक अहवाल WHO ने समोर आणला आहे. या अहवालात पाच देशांची नावं नमूद करण्यात आली आहे. पाच देशांपैकी एक नाव भारताचंही आहे कारण भारतात प्रदुषणाचं प्रमाण जास्त आहे. स्वयंपाक घरात जेवण तयार होत असताना निर्माण होणारे वायू प्रदूषण आणि घराबाहेर होणारे प्रदूषण याचा परिणाम अनेक मुलांच्या आरोग्यावर झाला आहे. ग्रीनपीसनेही या संदर्भातला एक अहवाल दिला आहे. ज्यानुसार भारतात होणारं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. एवढंच नाही तर दिल्लीत होणारं प्रदूषण सर्वाधिक आहे असंही ग्रीनपीसने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who toxic air killed over 1 lakh children in india in
First published on: 30-10-2018 at 05:24 IST