समुद्र आणि महासागरांचे पाणी खारट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु याचे कारण फार कमी लोकांना माहित आहे. समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही. समुद्रात इतके मीठ कोठून आले तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या वैज्ञानिक उत्तर

हेही वाचा- Christmas in December : ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

Patients, water borne diseases, Nagpur,
नागपूर : सावधान! जलजन्य आजाराचे रुग्ण वाढले, जाणून घ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी असलेले नियम
People Enjoying Sea Waves at Digha Beach by putting their lives in danger
“लोक ऐकत का नाही?” समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी जीव धोक्यात टाकताहेत, पाहा VIDEO
Home Remedies for Mansoon Insects
पावसाळ्यात घरातील फरशी पुसूनही माशा येतात? पुसण्याच्या पाण्यात ३ पदार्थ मिसळा; किडे, डास, झुरळ होतील छूमंतर
trending video man went into the sea with scooty for making reels see what happened next video viral
मूर्खपणाचा कळस! रीलसाठी खवळलेल्या समुद्रात स्कुटी घेऊन गेला अन्…; पाहा VIDEO
include sea voyage in natural disasters demand of farmer in raigad
उधाणांचा नैसर्गिक आपत्तीत समावेश करा, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी
How to drive through waterlogged roads during monsoons 5 tips for driving safely through floods
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा
Health, Health Special, problem,
Health Special: पावसाळ्यात अपचनाचा त्रास अधिक का होतो?
everything about cloud bursting
विश्लेषण : ढगफुटी का आणि कशी होते?

आपल्या पृथ्वीवर जवळपास ७० टक्के पाण्याचा साठा आहे. त्या साठ्यापैकी ९७ टक्के पाणी समुद्रात आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, महासागरामध्ये इतकं मीठ आहे की जर पृथ्वीवरील महासागरातून संपूर्ण मीठ बाहेर काढलं आणि जमिनीवर पसरवले तर त्याचे जवळपास ५०० मीटर उंच थर बनलतील.

समुद्रात मीठ कुठून येते?

समुद्रात नेमकं मीठ येतं कुठून? समुद्रात दोन स्त्रोतांद्वारे मीठ येतं. महासागरात बहुतेक मीठ नद्यांमधून येते. पावसाचे पाणी थोडे अम्लीय असते. जेव्हा हे पाणी जमिनीवरील खडकांवर पडते तेव्हा त्यातून तयार होणारे आयन नद्यांमध्ये मिसळते आणि ते पाणी नद्यांवाटे महासागरात पोहोचते. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून सुरू आहे.

हेही वाचा- साखर खाल्ल्याने खरंच मधुमेह होतो? काय आहे सत्य, घ्या जाणून

समुद्रात येणारा मीठाचा आणखी एक स्त्रोत आहे, तो म्हणजे समुद्रतळातून येणारा थर्मल द्रव. हे विशेष द्रव महासागरातील सर्व ठिकाणाहून येत नाहीत तर पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात असलेल्या छिद्र आणि विवरांमधून येतात. या छिद्रे आणि भेगांद्वारे समुद्राचे पाणी पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि गरम होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात आणि पाणी खारट बनते.

हेही वाचा- …म्हणून टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमानातील लाइट्स बंद करतात; खरं कारण जाणून अचंबित व्हाल!

समुद्राच्या पाण्याची क्षारता एकसमान नसते. तापमान, बाष्पीभवन आणि पर्जन्यमानामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये फरक दिसून येतो. विषुववृत्त आणि ध्रुवाजवळील प्रदेशात खारटपणाचे प्रमाण खूप कमी आहे. पण इतर ठिकाणी पाण्यात मीठाचे प्रमाण जास्त आहे.