पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल कोलकात्यामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो मध्ये झालेल्या हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. गुंड बाहेरुन आणले होते. त्यांनी भगवी वस्त्रे परिधान करुन हिंसाचार केला. बाबरी मशीद पाडताना झालेल्या हिंसाचारासारखा हा प्रकार होता अशा शब्दात त्यांनी टीका केली. West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: Goons were brought from outside, they created violence wearing saffron, violence similar to when Babri Masjid was demolished. — ANI (@ANI) May 15, 2019 पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराचा कालावधी २० तासांनी कमी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जबाबदार धरले आहे. असा निवडणूक आयोग मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही. प्रचाराचा कालावधी कमी करण्याचा निर्णय हा एक अनैतिक आणि राजकीय पक्षपातीपणा करणारा निर्णय आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या दोन सभा पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका केली. West Bengal CM, Mamata Banerjee: Election Commission's decision is unfair, unethical and politically biased. PM Modi given time to finish his two rallies tomorrow. pic.twitter.com/nsU9l5TJ7u — ANI (@ANI) May 15, 2019 प्रचार कालावधी कमी करण्याचा निर्णय अनपेक्षित होता. भाजपा निवडणूक आयोगाला चालवत आहे असा आरोप त्यांनी केला. अमित शाहंमुळे काल हिंसाचार झाला. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस का बजावली नाही? असा सवाल त्यांनी केला. West Bengal CM, Mamata Banerjee: Election Commission is running under the BJP. This is an unprecedented decision. Yesterday's violence was because of Amit Shah. Why has EC not issued a show-cause notice to him or sacked him? pic.twitter.com/1RKeviP4aR — ANI (@ANI) May 15, 2019 अमित शाहांनी अन्याय केला. शिक्षा आम्हाला मिळाली. अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये अराजकता निर्माण केली. बंगालची जनता भाजपाला कधीही माफ करणार नाही. अमित शाह यांनी बंगाल आणि बंगाली माणसांचा अपमान केला. मुकुल रॉय यांनी सर्व कट रचला असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.