कोणत्याही निवडणुकीदरम्यान निवडणूक चिन्हे महत्त्वाची असतात, कारण ती मतदारांना ते मतदान करू इच्छित असलेल्या उमेदवारांना ओळख पटवण्यास मदत करतात, विशेषत: पाकिस्तानसारख्या देशांसाठी जेथे बहुसंख्य मतदारसंघ ग्रामीण भागातील आहेत आणि साक्षरता दर कमी आहे. बिझनेस रेकॉर्डरने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) नोंदणीकृत राजकीय पक्षांना १५० वेगवेगळी चिन्हे आणि १७४ स्वतंत्र उमेदवारांना नियुक्त केले आहे.

विशेष म्हणजे इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या पक्षांतर्गत निवडणुका निवडणूक आयोगानं अवैध घोषित केल्यानंतर त्यांचे प्रतिष्ठित निवडणूक चिन्ह ‘बॅट’ गमावले आहे. परिणामी, पक्षाचे सदस्य २०२४ च्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक चिन्ह वापरून निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांना दिलेली काही चिन्हे असामान्य आहेत.

babajani durrani, Jayant Patil,
परभणीत अजित पवार गटाला धक्का ? बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर तर्कवितर्क
sharad pawar nifad nashik
दिंडोरीच्या यशानंतर शरद पवारांची निफाडमध्ये मोर्चेबांधणी, आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Loksatta anvyarth The highest number of independent candidates were elected in the National Assembly elections of Pakistan despite the party electoral recognition being revoked
अन्वयार्थ: पाक लोकशाही… जात्यातून सुपात!
Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
Wardha Political Aspirants Emerge After Lok Sabha Results Congress Leaders Seek MLA Tickets
काँग्रेसला सुगीचे दिवस…पण, दावेदारांसोबतच डोकेदुखीही वाढली…वर्धेत तर एका नेत्याने…
narsayya adam, narsayya adam master,
विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू 

हेही वाचाः अण्णादुराई, जयललिता ते थलपती विजय; तमिळनाडूच्या राजकारणावर सिनेसृष्टीचा प्रभाव काय? वाचा सविस्तर….

‘वांगं’

आमीर मुघल यांनी मतदारांच्या गर्दीसमोर वांगं दाखवलं खरं पण उमेदवारांना नियुक्त केलेल्या विचित्र चिन्हांमुळे त्यांचे नुकसान होत आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक राजधानी इस्लामाबादचे उमेदवार घोषित करतात, वांगी आता संपूर्ण पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध चिन्ह झाले आहे. “वांग आता हा भाजीचा राजा झाला आहे,” असाही प्रचार केला जात आहे. पाकिस्तानमध्ये साक्षरतेचा दर फक्त ६० टक्के आहे, तिथे राजकीय पक्ष प्रचार करीत असताना बॅलेट पेपरवर त्यांचे उमेदवार ओळखण्यासाठी चिन्हांचा वापर करतात. परंतु लष्करी कारवाईने विरोधी पक्षांवर दबाव आणला जात आहे. त्यातच काही उमेदवार म्हणतात की, निवडणूक अधिकारी त्यांच्या प्रचारात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे त्यांना एकतर निकृष्ट किंवा अगदी विचित्र चिन्हे वाटप करीत आहेत.

खान यांना गुरुवारच्या मतदानात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे आणि निवडणूक आयोगाच्या नियमांची पूर्तता करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाकडून त्यांच्या दीर्घकालीन क्रिकेट बॅटचे चिन्ह काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या डझनभर समर्थकांनाही निवडणुकीला उभे राहण्याची परवानगी नाही. काही जण आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काही जणांविरोधात छळाची तक्रार नोंदवली गेली आहे आणि त्यांना लपण्यास भाग पाडले जात आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चिन्हे अपक्षांसाठी तयार केलेल्या यादीतून निवडली गेली आहेत.

पाकिस्तानच्या उर्दू भाषेतील बायंगन हा पाकिस्तानी पाककृतीचा मुख्य घटक आहे. हे प्रतीकात्मक अर्थाने देखील घेतले जाते, विशेषत: पुरुष शरीरशास्त्राचे व्यंग म्हणून ते वापरले जाते. “निवडणूक आयोगाने आमची थट्टा करण्यासाठी आम्हाला हे चिन्ह दिले आहे,” असे ४६ वर्षीय मुघल म्हणाले. “आम्हाला विचित्र वाटले असून, ते लज्जास्पद असल्याचे कबूल करतो. किराणा दुकानात वांग्यांच्या किमती चौपटीने वाढल्याचा त्यांचा दावा आहे. “हे चिन्ह मला एक विलक्षण प्रसिद्धी देत आहे,” असेही मुघल उपरोधिकपणे म्हणालेत. “प्रत्येक मतदाराला ते पाहायचे आहे, कारण त्यांना माहीत आहे की हे चिन्ह इम्रान खानच्या उमेदवाराचे आहे.”

हेही वाचाः पाकिस्तान निवडणुकीतील महत्त्वाचे राजकीय नेते कोण? कोणाची सत्ता येणार?

पलंग

एजाज गड्डान हे पूर्व पंजाब प्रांतातील मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असून, त्यांच्या पूर्वजांची जन्मभूमी अन् तिथल्या लोकांचे अंतिम विश्रांतीचे ठिकाण असे त्याचे ते वर्णन करतात. कदाचित म्हणून त्यांच्या पक्षाला पलंग चिन्ह दिले गेले असेल. “त्यांनी आम्हाला अशी चिन्हे देऊन आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. काही उमेदवारांना कोणते चिन्ह मिळाले आहे हे सांगताना त्यांना लाज वाटते,” असेही बहावलपूरच्या ५० वर्षीय उमेदवाराने तक्रार केली. “ही निवडणूक नाही, ही क्रूरता आहे,” चारपाई हे निवडणूक चिन्ह असून, एक साधा लाकडी चौकटीचा पलंग ज्यावर विणलेल्या दोरीचा पृष्ठभाग असतो, सामान्यतः कमी उत्पन्न असलेल्या घरांमध्ये असा पलंग वापरला जातो. “ही एक अतिशय उपयुक्त घरगुती वस्तू आहे. जेव्हा आपण जिवंत असतो, तेव्हा चारपाई आपल्याला विश्रांतीची सोय करून देते. जेव्हा आपण मरतो, तेव्हा ती आपल्याला आपल्या अंतिम प्रवासात घेऊन जाते,” असेही गड्डन म्हणाले. “माझे चिन्ह आधीपासून प्रत्येक घरात उपलब्ध आहे. मला त्याची ओळख करून देण्याची गरज नाही.” लष्कराचं समर्थन असलेला पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ पक्ष भयंकर मोठ्या मांजरीच्या चिन्हासह प्रचार करीत आहे.

‘बाटली’

वायव्य पाकिस्तानमध्ये शहरयार आफ्रिदीला जेव्हा बाटलीचे चिन्ह देण्यात आले, तेव्हा तो संतापला होता. स्थानिक पश्तो भाषेत एखाद्या बाटलीला “रिकामे भांडे” असल्याचे म्हटले जाते. रिकामी बाटली म्हणजे अस्पष्ट भूमिका आणि विचार शून्यता असल्याचे तिकडचे नेते मानतात. खैबर पख्तुनख्वा प्रांतात जेथे पुराणमतवादी इस्लामचा प्रभाव आहे, तेथे मद्यसेवनाशीही त्याचा अर्थ जोडलेला आहे. कोहट शहरातील ४५ वर्षीय उमेदवार म्हणाले, “माझ्यासह बहुतेक पीटीआय उमेदवारांना अशी चिन्हे देण्यात आली होती, जी नकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी होती.” “आम्हाला जाणीवपूर्वक अशी चिन्हे देण्यात आली होती, जी आमची थट्टा करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.”

आफ्रिदीने प्रांतीय राजधानी पेशावरमधील उच्च न्यायालयात आपली बाजू मांडली, पण तेथे त्याला न्याय मिळाला नाही. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मैदानात उतरलो, तेव्हा आम्हाला बाटलीच्या चिन्हाबद्दल इतका वाईट प्रतिसाद मिळाला की, त्यामुळे आमच्या प्रचाराची सगळी हवाच निघून गेली.” परंतु कॅनी ऑपरेटरने यांनी बाटली चिन्हावरूनच चिमटा काढला. ते म्हणाले, “बाटली केवळ मद्यच दर्शवत नाही, तर ती औषधदेखील दर्शवते.” “म्हणूनच आम्ही आमचे निवडणूक चिन्ह औषधाच्या बाटलीत बदलले आहे, जेणेकरून आम्ही सर्व सामाजिक आजारांवर उपाय करू शकू.”